शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

हगणदरीमुक्तीमध्ये बुलडाणा जिल्हा विभागात तिसरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:42 IST

बुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरावती विभागात जिल्हा या मोहिमेमध्ये सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहे.

ठळक मुद्दे१00 टक्के हगणदरीमुक्तीकडे वाटचाल मिशन ९0 डेजचा सकारात्मक परिणाम

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यास जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. त्यानुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मिशन ९0 डेजचे सकारात्मक परिणाम समोर येत असून, अमरावती विभागात जिल्हा या मोहिमेमध्ये सध्या तिसर्‍या क्रमांकावर आहे. दरम्यान, जिल्ह्याची वाटचाल ही राज्यातील १९ हगणदरीमुक्त जिल्हा होण्याच्या दृष्टीने सुरू झाली आहे.बुलडाणा जिल्हा फेब्रुवारी अखेर हगणदरीमुक्तीच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन केले असून, त्यानुसार युद्ध पातळीवर काम सुरू आहे. बेसलाइन सर्वेक्षण २0१२ नुसार जिल्ह्यात २ लाख २५ हजार ५१ शौचालय बांधकाम बाकी होते. त्यापैकी आजपयर्ंत १ लाख ९१ हजार  ३५ शौचालय बांधकाम  पूर्ण झालेले आहे. ऑनलाइननुसार जिल्ह्यात ९१.७३ टक्के शौचालय बांधकाम पूर्ण झालेले आहे. चालू वर्षी ९३ हजार ३५२ वैयक्तिक शौचालय बांधकाम झाले असून, २९ हजार ७३७ शौचालय बांधकाम बाकी आहे. सदर काम फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्यासाठी शनिवारी सुटी असूनही मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ग्रामसेवकांचा आढावा घेऊन फेब्रुवारी अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी सक्त ताकीद दिली, तसेच ज्या ग्रामसेवकांचे काम असमाधानकारक आहे, त्यांचे स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी संनियंत्रण करणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. अजूनही मेहकर तालुक्यात ९२१२, चिखली तालुक्यात ६७५८, बुलडाणा तालुक्यात ४२४0, लोणार तालुक्यात ३0७४, मोताळा तालुक्यात २२१९, खामगाव तालुक्यात २२१0, तर सिंदखेड राजा तालुक्यात २0२४ शौचालय बांधकाम बाकी असल्यामुळे संबंधितांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सीईओंनी सांगितले.

विभागात अमरावती जिल्हा प्रथम१00 टक्के हगणदरीमुक्तीसाठी राज्यात सर्वच जिल्हे प्रयत्न करीत आहेत. आजपर्यंत १८ जिल्हे हगणदरीमुक्त झाले असून, १९ वा जिल्हा होण्यासाठी अमरावती विभागातील ५ जिल्हे प्रयत्न करीत आहेत. आज रोजी विभागात ९८.३३ टक्के उद्दिष्ट साध्य करीत अमरावती जिल्हा प्रथम, व्दितीय अकोला ९६.0६ टक्के, तृतीय बुलडाणा ९१.७३ टक्के, चवथा वाशिम ८९.२0 व  यवतमाळ जिल्हा  ८0.१३ टक्के उद्दिष्ट साध्य करीत पाचव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा