शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बुलडाणा जिल्हा : प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांअभावी अग्नीशामक वाहने हाताळताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:58 IST

मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे.

ठळक मुद्दे यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली.

- उद्धव फंगाळ मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. त्यामुळे या यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.    उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शॉटसर्किट सह अन्य कारणांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली. मात्र अत्यावश्यक मनुष्यबळच उपलब्ध पाच ते सहा वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मेहकर येथील ही वाहने शोभेची वस्तू बनल्या आहेत. शहरामध्ये तथा ग्रामीण भागात एखाद्या कारणाने आग लागल्यास सदर आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाची उपलब्धता करून देण्यात येते. मात्र सर्व सुविधा असतांनाही केवळ कर्मचाºयांची भरती नसल्याने अग्नीशमनच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. गाडी जर वेळेवर आली नाही तर खाजगी पाण्याचे टॅकर मागवून आग विझवण्यात येते. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून ही आवश्यक मनुष्यबळ का उपलब्ध करून दिले जात नाही, हा प्रश्न आहे. मेहकर पालिकेला अग्नीशमनची नविन गाडी मिळालेली आहे. या गाडीवर ८ कर्मचाºयांची पदे मंजुर आहेत. यामध्ये १ चालक ४ फायरमन, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक पर्यवेक्षक अशी ८ पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र ही यंत्रणा अद्यापही प्रभावीपणे कार्यान्वीत झालेली नाही. त्यामुळे मेहक उपविभागात आपतकालीन स्थितीत मदत कार्यकरण्यात प्रसंगी मोठ्या अडचणी जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या जागा त्वरेने भरण्यात याव्यात अशी मागणी होत असून खा. प्रतापराव जाधव यांनीही प्रशासनाने प्रकरणी दिरंगाई न करता यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वीत करावी, अशी मागणी केली आहे. अग्नीशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो. या विभागातील रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यासाठी  पालिका मुख्याधिकारी यांना सुचना केल्या आहेत.

डॉ. नीलेश अपार, एसडीओ, मेहकर

 अग्नीशमन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच हे कार्य पूर्णत्वास जाईल.

  - अशोक सातपुते,   मुख्याधिकारी, मेहकर पालिका

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरfireआग