शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्हा : प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांअभावी अग्नीशामक वाहने हाताळताना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:58 IST

मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे.

ठळक मुद्दे यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली.

- उद्धव फंगाळ मेहकर :  जिल्ह्यातील पालिकांकडे अद्ययावत अग्नीशामक यंत्रणा असली तरी ही यंत्रणा आणि पाच वर्षापूर्वी पालिकांना मिळालेली नवी वाहने आपतकालीन परिस्थितीत हाताळताना मोठी धावपळ होत आहे. त्यामुळे या यंत्रणेवर झालेला खर्च पाहता उपलब्ध साधने धुळखात पडल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. दुसरीकडे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षीतपणामुळे अग्नीश्यामक दलातील रिक्तपदांची भरतीच झालेली नसल्याने आपतकालीन यंत्रणा हाताळताना समस्या निर्माण होत असल्याचा आरोप खा. प्रतापराव जाधव यांनी केला आहे.    उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शॉटसर्किट सह अन्य कारणांमुळे ठिकठिकाणी आगी लागण्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. आग विझवण्यासाठी मेहकर सह जिल्ह्यातील प्रत्येक नगर पालीकेला २०१२ -१३ मध्ये शासनाने कोट्यवधीरुपये खर्च करून अधुनिक वाहने उपलब्ध करून दिली. मात्र अत्यावश्यक मनुष्यबळच उपलब्ध पाच ते सहा वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे मेहकर येथील ही वाहने शोभेची वस्तू बनल्या आहेत. शहरामध्ये तथा ग्रामीण भागात एखाद्या कारणाने आग लागल्यास सदर आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाची उपलब्धता करून देण्यात येते. मात्र सर्व सुविधा असतांनाही केवळ कर्मचाºयांची भरती नसल्याने अग्नीशमनच्या गाड्या वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही. गाडी जर वेळेवर आली नाही तर खाजगी पाण्याचे टॅकर मागवून आग विझवण्यात येते. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून ही आवश्यक मनुष्यबळ का उपलब्ध करून दिले जात नाही, हा प्रश्न आहे. मेहकर पालिकेला अग्नीशमनची नविन गाडी मिळालेली आहे. या गाडीवर ८ कर्मचाºयांची पदे मंजुर आहेत. यामध्ये १ चालक ४ फायरमन, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक पर्यवेक्षक अशी ८ पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला मात्र ही यंत्रणा अद्यापही प्रभावीपणे कार्यान्वीत झालेली नाही. त्यामुळे मेहक उपविभागात आपतकालीन स्थितीत मदत कार्यकरण्यात प्रसंगी मोठ्या अडचणी जाण्याची शक्यता आहे.  त्यामुळे या जागा त्वरेने भरण्यात याव्यात अशी मागणी होत असून खा. प्रतापराव जाधव यांनीही प्रशासनाने प्रकरणी दिरंगाई न करता यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वीत करावी, अशी मागणी केली आहे. अग्नीशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो. या विभागातील रिक्त असलेल्या जागा तत्काळ भरण्यासाठी  पालिका मुख्याधिकारी यांना सुचना केल्या आहेत.

डॉ. नीलेश अपार, एसडीओ, मेहकर

 अग्नीशमन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत पालिकास्तरावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अल्पावधीतच हे कार्य पूर्णत्वास जाईल.

  - अशोक सातपुते,   मुख्याधिकारी, मेहकर पालिका

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरfireआग