शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:33 IST

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे विरोध.संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे.

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. हा प्रकल्प या परिसरात झाल्यास या प्रकल्पात हजारो आदिवासी बांधवांच्या संत्राच्या बागा नष्ट होवून हा प्रकल्प येथे होणार आहे. तसेच हा प्रकल्प येथे झाल्यास आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही येथे उपस्थित होणार असून या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे या प्रकल्पाचा आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे. ज्याठिकाणी हा आलेवाडी सिंचन प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी आज सुमारे दीड लाख पेक्षाही जास्त प्रमाणात संत्र्याची फळबाग आहे. तसेच याच परिसरात ९५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात असल्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आल्यास ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच या प्रकल्पाला आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम थांबवुन हजारो आदिवासी बांधवांना न्याय द्यावा व भूमिहीन होणाºया आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आलेवाडी सिंचन प्रकल्पात बाधित होणाºया आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे. आदिवासींना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून आमची मौल्यवान बागायती जमीन हिरावून घेणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी आमची आदिवासी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. - सत्तार भिकन केदार, शेतकरी आलेवाडी

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण