शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बुलडाणा जिल्हा : आलेवाडी सिंचन प्रकल्पातील शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 15:33 IST

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे.

ठळक मुद्दे या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे विरोध.संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे.

संग्रामपूर :  बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे  प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे. हा प्रकल्प या परिसरात झाल्यास या प्रकल्पात हजारो आदिवासी बांधवांच्या संत्राच्या बागा नष्ट होवून हा प्रकल्प येथे होणार आहे. तसेच हा प्रकल्प येथे झाल्यास आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही येथे उपस्थित होणार असून या प्रकल्पामुळे ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार असल्यामुळे या प्रकल्पाचा आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प नामंजुर करावा, अशी अपेक्षा आदिवासी बांधवांकडून होत आहे. ज्याठिकाणी हा आलेवाडी सिंचन प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी आज सुमारे दीड लाख पेक्षाही जास्त प्रमाणात संत्र्याची फळबाग आहे. तसेच याच परिसरात ९५ टक्के आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. तसेच संग्रामपूर तालुक्यामधील सर्वात जास्त सुपीकच बागायत शेत जमीन ही याच परिसरात असल्यामुळे याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आल्यास ९५ टक्के आदिवासी बांधव भुमिहीन होणार आहेत. त्यामुळे सुरूवातीपासूनच या प्रकल्पाला आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम थांबवुन हजारो आदिवासी बांधवांना न्याय द्यावा व भूमिहीन होणाºया आदिवासी बांधवांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आलेवाडी सिंचन प्रकल्पात बाधित होणाºया आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे. आदिवासींना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असून आमची मौल्यवान बागायती जमीन हिरावून घेणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करावा, अशी आमची आदिवासी बांधवांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. - सत्तार भिकन केदार, शेतकरी आलेवाडी

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण