शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बुलडाणा जिल्ह्यातून वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता, ३३५ जणांना शोधण्यास पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:29 IST

खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्या. डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

- भगवान वानखेडे खामगाव: कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेलेल्या आणि पुन्हा शोधूनही न सापडलेल्या व्यक्तीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहे. मागील २०१७ या वर्षभरात जिल्ह्यातून १८ ते ५० वर्ष वयोगटातील तब्बल ५८९ व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. यापैकी ३३५ व्यक्ती मिळाल्याची सकारात्मक बाब जरी समोर येत असली तरी मात्र डिसेंबर २०१७ या एकाच महिन्यात ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती विचार करायला लावणारी आहे.घरी कुणालाच काही न सांगता शौचास जातो म्हणुन निघून जाणे, शेतात गेला आणि पुन्हा परतलाच नाही, मित्रांक डे, नातेवार्इंकाडे गेला होता पण आढळून आला नाही अशा अनेक तक्रारी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक पोलिस स्टेशनला तक्रारी देतात. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही संख्या जिल्ह्यातील सैलानी यात्रेदरम्यान सर्वाधिक वाढत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.डिसेंबर महिन्यात तब्बल ९० व्यक्ती बेपत्तामागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एकाच महिन्यात जिल्ह्यातून ९० व्यक्ती बेपत्ता होणे पोलिसांच्या कार्यकुशलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावणारे आहे. वर्षभरात ५८९ व्यक्ती बेपत्ता जरी झाल्या असल्या तरी ३३५ व्यक्ती शोधण्यात पोलिसांना यश आहे. यापेक्षाही अधिक व्यक्ती घरी परतलेल्या असतात परंतु हरवल्याची तक्रार दिली जाते परंतु घरी परत आल्याची माहिती दिली जात नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.आॅपरेशन मुस्कान लाभदायीपोलिस महासंचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला आॅपरेशन मुस्कान राबवण्यात येत आहे. यासाठी एक विशेष पथक ही तयार करण्यात आले आहे. या पथकाला बेपत्ता व्यक्ती शोधण्यात येत असून आगामी काळात हे आॅपरेशन आणखीन गतीमान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.कुटूंबातील व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार पटकन दिली जाते, परंतु त्या तुलनेत मात्र आढळून आल्याची माहिती पोलिस स्टेशनला दिली जात आहे. मात्र नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रारीबरोबरच आढळून आल्याची माहितीही द्यावी.-संदिप डोईफोडे, अतिरीक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस