शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

बुलडाणा जिल्ह्यात  २८ टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:26 IST

बुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरब्बी हंगाम धोक्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार!

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ऐन मोसमात सव्वा महिन्याची उघडीप दिलेल्या  पावसाने परतीचा प्रवास लांबविला आहे. त्याचा शेतीला फायदा  झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठा अद्याप २८.५३ टक् क्यांच्या आत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे  असून पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला.  जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या तिन मोठय़ा  प्रकल्पात पावसाळ्यापूर्वी 0४.४५ टक्के जलसाठा होता. आता  २३.८0 टक्के जलसाठा आहे. तर पलढग, ज्ञानगंगा, मस,  कोराडी, मन, तोरणा व उतावळी या ७ मध्यम प्रकल्पात एका  महिन्यापूर्वी १६.११ टक्के जलसाठा होता. आता ४१.८९ टक्के  जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यात ८१ लघुप्रकल्प आहेत.  यामध्ये एका महिन्यापूर्वी १२.0३ टक्के जलसाठा होता. आता  १९.९२ टक्के असा अल्प जलसाठा आहे. दीड महिन्यापूर्वी  जूनच्या पहिल्या आठवड्यात या पाणीसाठय़ाची जी स्थिती हो ती, त्यात नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उ पयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत ३७.६८ टक्के  जलसाठा आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी  जलसाठय़ाच्या तुलनेत १0.७४ टक्के जलसाठा आहे.तर   खडकपूर्णा प्रकल्पात उपयुक्त ९0.४0 दलघमी  जलसाठय़ाच्या  २२.९९  टक्के जलसाठा आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील तिन्ही  मोठय़ा प्रकल्पात एकूण २३.८0 टक्के जलसाठा आहे. यावरून  पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पात अल्प  जलसाठा असल्याचे दिसून येते.     

पलढग प्रकल्प व येळगाव धरण ओव्हरफ्लोपरतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्यामुळे कोरड्या पडत  चाललेल्या जलसाठय़ांमध्ये वाढ होऊ लागली. २७ सप्टेंबरपयर्ंत  सरासरीच्या ९२.७३ टक्के अर्थात ६६0.0८ मिमी पाऊस  झाल्यानंतरही जिल्ह्यातील जलसाठय़ांमध्ये असलेला साठा चिं ताजनकच आहे. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी  असे तीन मोठे प्रकल्प असून पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी,  मन, तोरणा, उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी  पलढग ओव्हरफ्लो झाले आहे. तर बुलडाणा तालुक्यातील  येळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र इतर प्रकल्पांमध्ये  जलसाठा अजूनही दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. 

मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठाजिल्ह्यातील एकूण ७ मध्यम प्रकल्पात ४१.८९ टक्के जलसाठा  आहे. त्यात पलढग प्रकल्प १00 टक्के भरला असून ज्ञानगंगा  प्रकल्पात ४0.५५, मस प्रकल्पात २८.७२, कोराडी प्रकल्पात  ३४.२६, मन प्रकल्पात २६.४४, तोरणा प्रकल्पात ३७.४0 व उ तावळी प्रकल्पात २४.८६ टक्के जलसाठा आहे.