शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बुलडाणा : सावजींचे गुरुवारपासून विहिरीत बसून आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:36 IST

झालेल्या गैरप्रकाराविरोधात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जानेवारीपासून मेहकर तालुक्यातील  बोरी येथील विहिरीत बसून आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी मंत्री सुबोध  सावजी यांनी १७ जानेवारीला बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअनेक पाणीपुरवठा योजना कागदोपत्रीअनेक गावात महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील १,४२0  गावातील शासकीय नळपाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार, अनियमितता झाल्याने या योजना कागदोपत्रीच दिसत असून, अनेक गावांत गेल्या ३0 वर्षांपासून ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई सुरू आहे. यामध्ये झालेल्या गैरप्रकाराविरोधात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जानेवारीपासून मेहकर तालुक्यातील  बोरी येथील विहिरीत बसून आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती माजी मंत्री सुबोध  सावजी यांनी १७ जानेवारीला बुलडाणा येथे पत्रकार परिषदेत दिली.स्थानिक जिजामाता क्रीडा संकुलातील जिमखाना सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष वा. रा. पिसेही उपस्थित होते. सुबोध सावजी म्हणाले की, प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून पाणीपुरवठा नळयोजना, रस्ते, एसटी बस, दिवाबत्तीची माहिती घेऊन शासकीय नळ योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी सदस्यांनी रजिस्टर बुकमध्ये नोंद केली आहे. मेहकर तालुक्यातील १४२ गावात पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त तसेच किडनीग्रस्त मृत कुटुंबाचे सांत्वन करून २७ कुटुंबांना प्रत्येकी १0 हजार रुपयांची वैयक्तिक मदत दिली. १४२ गावात नळपाणीपुरवठा योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारामुळे गावात नळ योजनेचे पाणी मिळत नाही. पारखेड, वाघदेव, नागेशवाडी येथे अर्धवट जलवाहिनी टाकल्याने १५ वर्षांपासून पाणी नाही. टेंभुरखेड गावात जलस्वराज्य योजनेचे पाइपच चोरीला गेले. स्वीच रूमचा वापर कडबा कुटार भरण्यासाठी होतो. घाटबोरी येथे १९८६ च्या नळयोजना जलस्वराज्य माध्यमातून पाण्याची टाकी बांधलेली आहे. पाइपलाइन जोडली; परंतु मोटरपंप नसल्याने गावात पाणी मिळत नाही. मोळा गावात शासकीय विहिरीचे पाणी खासगी शेती पिकांसाठी होते. पाण्याची टाकी नादुस्त आहे. यासह अन्य गावातील स्थितीची त्यांनी माहिती दिली. डोणगावात १९९0 पर्यंतच्या दोन पाणी पाणीपुरवठा सुरू आहेत. महिन्यातून एकदा पाणी मिळते. जलस्वराजची पावणे पाच कोटींच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी त्यांनी केले.

जिल्हाधिकार्‍यांनी बोलावली बैठकजळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात १५ नोव्हेंबर रोजी बैठा सत्याग्रह करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन २२ जानेवारीला जिल्हाधिकार्‍यांनी समिती पदाधिकारी व सदस्यांची दुपारी चार वाजता बैठक आयोजित केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन