शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बुलडाणा : कृषी पंप देयक दुरुस्तीसाठी आता स्वतंत्र शिबिरे; यंत्रणेला निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:03 IST

बुलडाणा : कृषी पंपधारकांकडे असलेल्या थकित देयके भरण्यासाठी तथा त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महावितरणने फिडरनिहाय देयक दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीन हजार किंवा पाच हजार रुपये भरून कृषी ग्राहक सहभागी झाला असेल, तर पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश महावितरणने २८ डिसेंबर रोजीच काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.

ठळक मुद्देथकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कृषी पंपधारकांकडे असलेल्या थकित देयके भरण्यासाठी तथा त्यांच्या दुरुस्तीसाठी आता महावितरणने फिडरनिहाय देयक दुरुस्ती शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेतंर्गत तीन हजार किंवा पाच हजार रुपये भरून कृषी ग्राहक सहभागी झाला असेल, तर पहिल्या हप्त्याची मुदत संपेपर्यंत त्याचा वीज पुरवठा खंडित करू नये, असे निर्देश महावितरणने २८ डिसेंबर रोजीच काढलेल्या परिपत्रकात दिले आहेत.सोबतच ज्या कृषी ग्राहकांनी सवलतीच्या दरानेसुद्धा रक्कम भरली नसेल, अशा थकबाकीदार कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येणार असल्याचेही संबंधित पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. कृषी ग्राहकांच्या वीज देयकाची दुरुस्ती करताना ग्राहकाचा मंजूर तसेच जोडलेला विद्युत भार, मीटरवरील वाचन, फिडरवरील वीज वापराचा निर्देशांक, वापराचे तास संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयाने विचारात घेणे क्रमप्राप्त असल्याचेही महावितरणचे म्हणणे आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दीड लाख वीज ग्राहकांकडे नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर ८१८ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यातील ५७ हजार ५८६ कृषी पंपांना वीज पुरवठा घेतल्यापासून देयकच भरण्यात आले नसल्याचे जनसंपर्क विभागाचे म्हणणे होते. थकबाकी भरणार्‍या कृषी पंपांची वीज खंडित होणार नाही; परंतु ज्यांनी थकबाकी भरलीच नाही, अशांची वीज खंडित करण्यात येणार आहे. सोबतच शेती पंपांची वीज खंडित होणार नाही, अशा आशयाच्या वृत्ताचे महावितरणे खंडन केले आहे.

तर तीन दिवसांत रोहित्र बदलून मिळणार!वीज रोहित्रावरील सर्व कृषी पंपधारकांनी देयकाचा भरणा केल्यास नादुरुस्त वीज रोहित्र तीन दिवसांत बदलून देण्याबाबत महावितरणने निर्देशित केले आहे. कृषी पंपांची वीज देयके दुरुस्ती आणि वसुलीच्या कामात दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही महावितरणे २८ डिसेंबर रोजीच दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी