शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बुलडाणा विभाग : एसटी गाड्यांच्या ७६ अपघातांपैकी ५२ अपघातामध्ये चालक जबाबदार; प्राथमिक अहवालातील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:44 IST

बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षात एसटीचे ७६ अपघात झाले असून ११ अपघात हे प्राणांतिक स्वरुपाचे झाले आहेत. तब्बल ५२ अपघाताच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत बस चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. २४ अपघातामध्ये अन्य वाहनाचे चालक अपघातास जबाबदार तर यांत्रिक त्रुटीमुळे २०१६ मध्ये एक अपघात झाल्याचे पाहणीत समोर आले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. दरम्यान, या पैकी तब्बल ५२ अपघातामध्ये प्राथमिकस्तरावरील चौकशी अहवालात चालक जबाबदार असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. दुसरीकडे २०१६ पासून सुरू केलेल्या अपघात सहाय्यता निधी योजनेसाठी प्रतितिकिटावर आकरण्यात येणार्या एक रुपया अधिभारापोटी संपलेल्या वर्षात चार कोटी २२ लाख ५७६ रुपयांचा निधी जमा झाला. गेल्या ७० वर्षाच्या काळात एसटीने सुरक्षीत प्रवास अशी ओळख निर्माण केली असली तरी गेल्या वर्षभरात बुलडाणा विभागातंर्गत बसगाड्यांचे ७६ अपघात झाले आहेत. त्यामुळे अपघात मुक्त एसटी असे लक्ष सध्या ठेवण्यात आले असून त्यासाठीच ही सुरक्षितता मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार १० ते २५ जानेवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षात एसटीचे ७६ अपघात झाले असून ११ अपघात हे प्राणांतिक स्वरुपाचे झाले आहेत. तर गंभीर स्वरुपाचे ४८ तर किरकोळ स्वरुपाचे १७ अपघात झाले आहे. यामध्ये तब्बल ५२ अपघाताच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत बस चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. तर २४ अपघातामध्ये अन्य वाहनाचे चालक अपघातास जबाबदार तर यांत्रिक त्रुटीमुळे २०१६ मध्ये एक अपघात झाल्याचे पाहणीत समोर आले आहे. बसगाड्यांची हालतही खस्ता झाली आहे. लांबपल्ल्याच्या बसगाड्या ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाणही अलिकडील काळात वाढले आहे. सुरक्षितता मोहिमेंतंर्गत त्या दृष्टीनेही तपास होण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. नाही म्हणायला सरत्या वर्षात विना अपघात सेवा देणार्या १४५ चालकांना बिल्ले वाटप करण्यात येऊन ३६३ बस चालकांना बक्षीसही देण्यात आले आहे. २६० दिवस अपघात विरहीत सेवा देणार्या चालकांना हे बक्षीस दिल्या जाते. प्राथमिक तपासणीमध्ये ५२ चालक गेल्या वर्षात जबाबदार असल्याचे दिसून आले असून डीफॉल्ट सेक्शनमध्ये अशा चालकांवर कारवाई करण्यात येते. त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिल्याने अपघातावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ