शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा विभाग : एसटी गाड्यांच्या ७६ अपघातांपैकी ५२ अपघातामध्ये चालक जबाबदार; प्राथमिक अहवालातील माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 18:44 IST

बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षात एसटीचे ७६ अपघात झाले असून ११ अपघात हे प्राणांतिक स्वरुपाचे झाले आहेत. तब्बल ५२ अपघाताच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत बस चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. २४ अपघातामध्ये अन्य वाहनाचे चालक अपघातास जबाबदार तर यांत्रिक त्रुटीमुळे २०१६ मध्ये एक अपघात झाल्याचे पाहणीत समोर आले आहे.

- नीलेश जोशी

बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. दरम्यान, या पैकी तब्बल ५२ अपघातामध्ये प्राथमिकस्तरावरील चौकशी अहवालात चालक जबाबदार असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. दुसरीकडे २०१६ पासून सुरू केलेल्या अपघात सहाय्यता निधी योजनेसाठी प्रतितिकिटावर आकरण्यात येणार्या एक रुपया अधिभारापोटी संपलेल्या वर्षात चार कोटी २२ लाख ५७६ रुपयांचा निधी जमा झाला. गेल्या ७० वर्षाच्या काळात एसटीने सुरक्षीत प्रवास अशी ओळख निर्माण केली असली तरी गेल्या वर्षभरात बुलडाणा विभागातंर्गत बसगाड्यांचे ७६ अपघात झाले आहेत. त्यामुळे अपघात मुक्त एसटी असे लक्ष सध्या ठेवण्यात आले असून त्यासाठीच ही सुरक्षितता मोहीम हाती घेण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार १० ते २५ जानेवारी दरम्यान ही मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षात एसटीचे ७६ अपघात झाले असून ११ अपघात हे प्राणांतिक स्वरुपाचे झाले आहेत. तर गंभीर स्वरुपाचे ४८ तर किरकोळ स्वरुपाचे १७ अपघात झाले आहे. यामध्ये तब्बल ५२ अपघाताच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत बस चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. तर २४ अपघातामध्ये अन्य वाहनाचे चालक अपघातास जबाबदार तर यांत्रिक त्रुटीमुळे २०१६ मध्ये एक अपघात झाल्याचे पाहणीत समोर आले आहे. बसगाड्यांची हालतही खस्ता झाली आहे. लांबपल्ल्याच्या बसगाड्या ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाणही अलिकडील काळात वाढले आहे. सुरक्षितता मोहिमेंतंर्गत त्या दृष्टीनेही तपास होण्याची गरज प्रतिपादीत होत आहे. नाही म्हणायला सरत्या वर्षात विना अपघात सेवा देणार्या १४५ चालकांना बिल्ले वाटप करण्यात येऊन ३६३ बस चालकांना बक्षीसही देण्यात आले आहे. २६० दिवस अपघात विरहीत सेवा देणार्या चालकांना हे बक्षीस दिल्या जाते. प्राथमिक तपासणीमध्ये ५२ चालक गेल्या वर्षात जबाबदार असल्याचे दिसून आले असून डीफॉल्ट सेक्शनमध्ये अशा चालकांवर कारवाई करण्यात येते. त्यांना पुन्हा प्रशिक्षण दिल्याने अपघातावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ