शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 14:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या एक दशकापासून दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील दोन लाख १२ हजार शेतकऱ्यांना अद्यापही गत वर्षी दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. ही रक्कम जवळपास १३९ कोटींच्या घरात जाते. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याअनुषंगाने शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर आणि जळगाव जामोद तालुक्यातील ५८६ गावातील दोन लाख २७२ हजार हेक्टर क्षेत्र या पाच तालुक्यात बाधीत झाले होते. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या जवळपास ३१ टक्के पाऊस कमी पडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात आठ तालुक्यातील ५५ मंडळामधील ८३४ गावांमध्ये दुष्काळ ३१ आॅक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. नवीन निकषाच्या आधारावर हा दुष्काळ जाहीर झाला होता. मात्र जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यातील ३८ मंडळामधील ५८६ गावांचीही स्थिती बिकट होती. त्यानुषंगाने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे २७ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित मंडळामध्ये पडलेला पाऊस, पीक कापणी प्रयोगाचा अहवाल आणि उत्पादकतेसंदर्भातील अहवालाचा मॅन्युअली अभ्यास करून पुढील निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यासंदर्भाने सहा नोव्हेंबर २०१८ ते २१ फेब्रुवारी २०१९ दरम्यान उर्वरित ३८ मंडळातील ५८६ गावात दुष्काळ जाहीर झाला होता.मात्र प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील ८३४ गावातील तीन लाख २० हजार ३०८ शेतकºयांना १९५ कोटी २४ लाख ३१ हजार ३५३ रुपयांची मदत देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झालेल्या उपरोक्त गावातील शेतकºयांना ९८ टक्के मदत वाटप करण्यात आली होती. दरम्यान, पहिल्या टप्प्यात दुष्काळ घोषित झालेल्या भागातही ८९ कोटी २२ लाख ३७ हजार रुपयांचा निधी वाटप करणे बाकी आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने अमरावती आयुक्त कार्यालयाकडे अनुषंगीक मागणी केलेली आहे. मात्र अद्यापही रक्कम मिळालेली नाही. तहसिल कार्यालयाकडूनही त्याची मागणी होत आहे. उर्वरित पाच तालुक्यातील ५८६ गावांतील शेतकºयांनाही दुष्काळामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आॅगस्ट २०१९ उजाडले असतानाही मिळालेली नाही. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे २० जुलै रोजीच प्रस्ताव पाठविला आहे. मात्र अद्यापही रक्कम उपलब्ध झाली नाही. यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस असला तरी प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मात्र वाढ झालेली नाही.

पाच तालुक्याील शेतकºयांच्या दुष्काळी मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील ८९ कोटी रुपयांचाही प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.-भिकाजी घुगेनिवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी