शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुलडाणा जिल्ह्यात आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 12:24 IST

Crime News : जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्ह्यातील मागील आठ महिन्यांत ७४ महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. विशेष म्हणजे यासोबतच विनयभंग झालेल्या महिला-मुलींचीही संख्या २८६ एवढी असून, यामुळे जिल्ह्यातील महिला-मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून पाहिजे तेवढे प्रयत्न केले जातात. यासोबतच गुन्हेगारीने डोकेवर काढू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया आणि अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे हे जिल्ह्यावर कटाक्षाने नजर ठेवून आहेत. असे जरी असले तरी जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होत असलेले अत्याचार चिंतेचा विषय बनत आहे. विशेष म्हणजे आता महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

७४ महिलांवर झाले अत्याचार

  जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत.

  यामध्ये बहुतांश प्रकरणे ही ग्रामीण भागातील असून, गुन्हेगारांवर कायद्याचा वचक ठेवणे आता गरजेचे झालेले आहे.

  पुढील काळात याबाबत कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. एकीकडे पोलिसांच्या तपासाची गती वाढत असताना दुसरीकडे त्याच तुलनेत गुन्हेही घडत आहेत.

 

गतवर्षीच्या तुलनेत वाढ

  जिल्ह्यात २०२१ या वर्षातील आठ महिन्यांत ७४ महिलांवर अत्याचार झाले आहेत. तर २०२० या वर्षातील आठ महिन्यांत ही आकडेवारी ५४ एवढी होती. तेव्हा जिल्ह्यात सुरू असलेल्या वर्षाची अत्याचाराची संख्या लक्षणीय असून, महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

२८६ विनयभंगांची नोंद

  जिल्ह्यात अत्याचाराबरोबरच विनयभंगाच्या घटनांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत तब्बल २८६ महिला-मुलींचे विनयभंग झाले असल्याची नोंद आहे. २०२० या वर्षात ही संख्या २७८ एवढी होती. तर तपास शंभर टक्के पूर्ण झाला होता. तो यंदा ९९ टक्के एवढा आहे.

तपास ९९ टक्के

जिल्ह्यात जरी महिलांवरील अत्याचार वाढले असले तरी दुसरीकडे मात्र, पोलिसांच्या तपासाची गतीही उल्लेखनीय आहे. कारण, झालेल्या ७४ अत्याचारापैकी ७३ प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांंना यश आले आहे. जे की २०२० या वर्षात शंभर टक्के एवढे होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा