शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:17 IST

बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षापासून या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना एक निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहे. या गावात रोजगार नाही, आरोग्य सुविधा नाहीत. शैक्षणिक सुविधांचाही येथे अभाव आहे. ग्रामस्थांनी आमदार, खासदारांना वेळोवेळी अनुषंगीक विषयान्वये निवेदने दिली आहेत. मात्र राजकीय व्यक्तींनीही येथील समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थ शेवटी या पवित्र्यात आले आहे. त्यात शासकीय योजनांचा येथील शेतकर्यांनाही लाभ मिळत नाही. शेतकर्यांना मिळालेल्या वर्ग दोन च्या जमीनीच्या ७/१२ ची वाटणीपत्रक (पोटहिस्से) करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी मिळावी जेणेकरून शेतकरी शासकीय योजनाचा लाभ घेऊ शकतील ही या ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांना रस्ता नसलेल्या या गावातून रुग्णालयात नेतांना मोठी अडचण आहे. या असुविधांअभावी यापूर्वी येथे काही महिलांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी जो पर्यंत येथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात माजी सरपंच साधना बुद्धेश्वर हिवाळे, आम्रपाली श्रीकृष्ण हिवाळे, अ‍ॅड. जीवन गवई, वंदना झीने, दिलीप पवार, बुद्धेश्वर हिवाळे, राजेंद्र जाधव, ऋषीकेश हिवाळे, धिरज हिवाळे यांच्यासह अन्य नागरिकांनी हे निवेदनन दिले आहे. प्रशासनाने प्रशासनाने येथे पायाभूत सविधा उपलब्ध कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९