शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : देव्हारी ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 13:17 IST

बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या वनग्राम देव्हारी येथील ग्रामस्थांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षापासून या गावाला जाण्यासाठी साधा रस्ताही नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना एक निवेदनही ग्रामस्थांनी दिले आहे. या गावात रोजगार नाही, आरोग्य सुविधा नाहीत. शैक्षणिक सुविधांचाही येथे अभाव आहे. ग्रामस्थांनी आमदार, खासदारांना वेळोवेळी अनुषंगीक विषयान्वये निवेदने दिली आहेत. मात्र राजकीय व्यक्तींनीही येथील समस्या निराकरणासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थ शेवटी या पवित्र्यात आले आहे. त्यात शासकीय योजनांचा येथील शेतकर्यांनाही लाभ मिळत नाही. शेतकर्यांना मिळालेल्या वर्ग दोन च्या जमीनीच्या ७/१२ ची वाटणीपत्रक (पोटहिस्से) करण्यासाठी महसूल विभागाकडून परवानगी मिळावी जेणेकरून शेतकरी शासकीय योजनाचा लाभ घेऊ शकतील ही या ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांना रस्ता नसलेल्या या गावातून रुग्णालयात नेतांना मोठी अडचण आहे. या असुविधांअभावी यापूर्वी येथे काही महिलांचा मृत्यू सुद्धा झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी जो पर्यंत येथील ग्रामस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंदर्भात माजी सरपंच साधना बुद्धेश्वर हिवाळे, आम्रपाली श्रीकृष्ण हिवाळे, अ‍ॅड. जीवन गवई, वंदना झीने, दिलीप पवार, बुद्धेश्वर हिवाळे, राजेंद्र जाधव, ऋषीकेश हिवाळे, धिरज हिवाळे यांच्यासह अन्य नागरिकांनी हे निवेदनन दिले आहे. प्रशासनाने प्रशासनाने येथे पायाभूत सविधा उपलब्ध कराव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९