शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : चार टक्के विद्यार्थ्यांचीच वसतिगृह, आश्रमशाळेत हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:07 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे.

ठळक मुद्देअवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे.अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. 

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील २५ वसतिगृहे व आश्रमशाळा सुरू झालेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने मुलांना आश्रमशाळा, वसतिगृह व निवासी शाळेत पाठविण्याची पालकांमध्ये भीती आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी अवघ्या चार टक्केच विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती राहत आहे. अनेक अडचणी आश्रमशाळेची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा-महाविद्यालय सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतीक्षा होती. दरम्यान, इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा आणि विजाभज आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ४६ संस्थांपैकी २५ संस्था सुरू करण्यात आलेल्या आहेत; परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे वसतिगृह, निवासी शाळा व आश्रमशाळांमध्ये पाल्यांना पाठविण्यासाठी अनेक पालक तयार नाहीत. राज्य शासनाच्या आदेशानुसार मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पालकांचे संमतिपत्र घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये बहुतांश पालकांनी संमतिपत्रामध्ये नकार दर्शविला आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये एकूण २ हजार ३८९ विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी केवळ १११ विद्यार्थ्यांचीच उपस्थिती राहत आहे. यातील काही शाळा ह्या कोविड सेंटर असल्याने त्या आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ज्या शाळा सुरू झाल्या त्यामध्ये पाल्यांना पाठविण्यास पालक तयार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही येथील यंत्रणा सुरळीत झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.

आश्रमशाळांसमोर अडचणीपालकांकडून संमतिपत्र घेण्यात येत असल्याने अनेक पालक मुलांना आश्रमशाळेत पाठविण्यास तयार होत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील आश्रमशाळेत ७९४ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७१ विद्यार्थी उपस्थित राहत आहेत. ७२३ पालकांनी आश्रमशाळेत पाल्यांना पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे आश्रमशाळांसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, विजाभज आश्रमशाळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचेच वर्ग सुरू आहेत. ज्या शाळा, वसतिगृह  कोविड सेंटर अलगीकरण कक्षासाठी आहेत, त्या बंदच आहेत. त्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांशी संपर्क साधत आहोत. - अनिता राठोड,  सहायक आयुक्त, समाजकल्याण.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा