शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

बुलडाणा : कोटा येथून २९ विद्यार्थी परतले;  दीड महिन्यापासून होते अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 10:44 IST

मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.

- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘लॉकडाउन’मुळे राजस्थानमधील कोटा येथे गेल्या दीड महिन्यापासून अडकलेले जिल्ह्यातील विद्यार्थी घरी येण्याची आस्थेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली अन् शुक्रवारी २९ विद्यार्थ्यांना प्रशासनाने एसटी बसद्वारे घरपोच सोडले. मुलांना समोर पाहताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले व त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडत प्रशासनाचे आभार मानले.शिक्षणानिमित्त राजस्थानमधील कोटा येथे गेलेले महाराष्ट्रातील १ हजार ७६४विद्यार्थी ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले होते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पालकांकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात येत होती. पालकांच्या मागणीनंतरही प्रशासनाकडून त्यांना परत आणण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. अखेर यासंदर्भात २९ एप्रिल रोजी वरीष्ठ पातळीवरून निर्णय होऊन विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून परत आणले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातून १० बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार व बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्याकरीता सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. बुलडाणा जिल्ह्यातील २९ विद्यार्थ्यांना दोन बस (क्रमांक एम-एच- २० -बीएल - ३०३१ व एम-एच-१४ - बीएल - ४०४९) च्या माध्यमातून सोडण्यात आले. विद्यार्थी १ मे रोजी घरी पोहचले. मुलांना समोर पाहताच पालकांना गहिवरून आले.

तपासणी करून ‘होम क्वारंटीन’चा सल्लाकोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसच्या माध्यमातून सर्वप्रथम खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात सोडण्यात आले. याठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थी निरोगी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले व १४ दिवस ‘होम क्वारंटीन’ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर सर्व विद्यार्थी खासगी वाहनाने आपल्या मूळगावी पोहचले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी