शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ब्रिटिशकालीन पैसेवारी शेतक-यांना मारकच!

By admin | Updated: December 11, 2015 02:56 IST

कृषी विद्यापीठाने सुधारित पीक पैसेवारीसंदर्भात शासनाला सुचविल्यात महत्त्वपूर्ण सुधारणा.

अकोला: ब्रिटिशकालीन पीक पैसेवारी शेतकर्‍यांच्या मुळावर उठली असून, ही पैसेवारी बदलण्यास शासन अनुकूल असल्याने शेतकर्‍यांचे या हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करू न शासनाकडे पाठविला असून, यावर विचार झाल्यास शेतकर्‍यांचे भले होईल.ब्रिटिशकालीन पैसेवारीनुसार नुकसानाचा पुरेपूर मोबदला मिळत नसल्याने शेतकरी या पैसवारीबाबत नाराज आहे. गत दोन वर्षाचा ओला आणि यंदाच्या कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर गावची आर्थिक स्थिती ठरविणार्‍या पैसेवारीच्या निकषात सुधारणा करण्याबाबत शासनाने तत्परता दाखविणे अपेक्षित आहे. यासंदर्भात शासन अनुकूल आहे. सध्या पीक पैसेवारी चुकीचीच निघत असल्याने या पैसेवारीनुसार अत्यंत तोकडी मदत मिळते. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पैसेवारीचा सूक्ष्म अभ्यास करू न शासनाला अहवाल पाठविलेला आहे. ज्या समित्यांनी पैसेवारीचे अहवाल दिले आहेत, त्यामध्ये महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या आहेत. कृषी विद्यापीठाने सुधारित पीक पैसेवारीसंदर्भात शासनाला वारंवार प्रस्ताव पाठवले आहेत. कृषी विद्यापीठाने यासंदर्भात एक चांगला अभ्यास केलेला आहे. शासनाने या पीक पैसेवारीची अंमलबजावणी केल्यास निश्‍चित शेतकर्‍यांना फायदा होईल, असे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सांगीतले. अहवाल बांधलेलेच १९६२, १९७६, १९७१, १९७६, १९८४ साली वेगवेगळ्या समितीने शिफारशी केल्या आहेत. १९८४ मध्ये भगवंतराव गायकवाड समितीने नजर अनुमान पैसेवारीची शिफारस केलेली आहे; तथापि पीक परिस्थितीत बदल झाल्यास सुधारित हंगामी (तात्पुरती) पैसेवारी जाहीर करण्याचे म्हटले आहे. परंतु, एकाही शेतकर्‍याला पूरक मोबदला मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकर्‍यांना नुकसानीचा यथायोग्य मोबदला हवा आहे. शासन या बाबतीत अनुकूल आहे. या प्रचलित पद्धतीत बदल करण्याची गरज असून, त्यासाठी शेतकर्‍यांचे लक्ष हिवाळी अधिवेशनाकडे लागले आहे.