शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:34 IST

खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली.

बुलडाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे कृषी विभागाने बोगस बियाण्यावरून एका शेतकºयावर कारवाई केल्याने बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. बोगस बियाण्यावरून शेतकºयांमध्येही संभ्रम वाढला असून, पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाकडून कृषी केंद्राची तपासणी सोडून थेट शेतकºयांवर कारवाई होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली. या कारवाईने कृषी क्षेत्राच्या वर्तुळात गोंधळ उडाला आहे. प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. भारतात काही बियाण्यांच्या लागवडीवर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. तसेच तणनाशक प्रतिरोध करणाºया कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याला जगभर मान्यता देण्यात आलेली असताना भारतात मात्र अजूनही पर्यावरण कायद्यांतर्गत त्याला मान्यता देण्यात येत नाही. शासनाच्या या धोरणांचा निषेध नोंदवून अशा प्रकारचे कोणतेही तंत्रज्ञानाचे व शेतकºयांच्या उत्पादनात भर घालणाºया बियाण्यावरील बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. सध्या शेतकºयांची खत, बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. अशातच सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे घडलेल्या कपाशीच्या एचटीबीटी प्रकरणाने शेतकºयांमध्ये बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, याची धास्ती निर्माण झाली आहे. कुठलेही सोयाबीन, कपाशी यापैकी कुठलेही बियाणे खरेदी करताना शेतकरी विचार करीत आहेत.बुलडाण्यात होणार सविनय कायदेभंग!कापसाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाºया धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एचटीबीटी कापसाच्या बियाण्याची लागवड करून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शेतकरी नामदेवराव जाधव, एकनाथ थुट्टे, सुरेश सोनुने यांच्यासह शेतकरी सहभागी होणार आहेत.शेतकरी अडचणीतबोगस बियाण्यावरून झालेल्या या कारवाईनंतर शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, प्रतिबंधित बियाणे कसे ओळखायचे, याची कुठलीच जागृती कृषी विभागाकडून करण्यात आली नाही. कोणत्या बियाण्यावर बंदी आहे, यापासून शेतकरीच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

प्रगत देशात कमीत-कमी खर्चात अधिक उत्पादन वाढविण्यात येत आहे; मात्र भारतात जनुकीय बदल केलेल्या बियाण्याच्या लागवडीस प्रतिबंध करण्यात येत आहे. शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे; मात्र येथे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याचा विचार न होता उलट त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.- नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी