शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

बोगस बियाण्यावरून शेतकऱ्यांमध्ये वाढला संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 15:34 IST

खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली.

बुलडाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे कृषी विभागाने बोगस बियाण्यावरून एका शेतकºयावर कारवाई केल्याने बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. बोगस बियाण्यावरून शेतकºयांमध्येही संभ्रम वाढला असून, पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाकडून कृषी केंद्राची तपासणी सोडून थेट शेतकºयांवर कारवाई होत असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त होत आहे.खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आलेली असताना कृषी विभागाने सिंदखेड राजा तालुक्यातील एका शेतकºयावर बोगस बियाणे प्रकरणी कारवाई केली. या कारवाईने कृषी क्षेत्राच्या वर्तुळात गोंधळ उडाला आहे. प्रशासनाच्या या कारभारावर शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. भारतात काही बियाण्यांच्या लागवडीवर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. तसेच तणनाशक प्रतिरोध करणाºया कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याला जगभर मान्यता देण्यात आलेली असताना भारतात मात्र अजूनही पर्यावरण कायद्यांतर्गत त्याला मान्यता देण्यात येत नाही. शासनाच्या या धोरणांचा निषेध नोंदवून अशा प्रकारचे कोणतेही तंत्रज्ञानाचे व शेतकºयांच्या उत्पादनात भर घालणाºया बियाण्यावरील बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. सध्या शेतकºयांची खत, बियाणे खरेदीची लगबग सुरू आहे. अशातच सिंदखेड राजा तालुक्यातील उमरद येथे घडलेल्या कपाशीच्या एचटीबीटी प्रकरणाने शेतकºयांमध्ये बोगस बियाणे नेमके ओळखायचे तरी कसे, याची धास्ती निर्माण झाली आहे. कुठलेही सोयाबीन, कपाशी यापैकी कुठलेही बियाणे खरेदी करताना शेतकरी विचार करीत आहेत.बुलडाण्यात होणार सविनय कायदेभंग!कापसाच्या एचटीबीटी बियाण्यावर बंदी करणाºया धोरणाचा निषेध करण्यासाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एचटीबीटी कापसाच्या बियाण्याची लागवड करून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शेतकरी नामदेवराव जाधव, एकनाथ थुट्टे, सुरेश सोनुने यांच्यासह शेतकरी सहभागी होणार आहेत.शेतकरी अडचणीतबोगस बियाण्यावरून झालेल्या या कारवाईनंतर शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यायची, प्रतिबंधित बियाणे कसे ओळखायचे, याची कुठलीच जागृती कृषी विभागाकडून करण्यात आली नाही. कोणत्या बियाण्यावर बंदी आहे, यापासून शेतकरीच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

प्रगत देशात कमीत-कमी खर्चात अधिक उत्पादन वाढविण्यात येत आहे; मात्र भारतात जनुकीय बदल केलेल्या बियाण्याच्या लागवडीस प्रतिबंध करण्यात येत आहे. शेतकºयांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकºयांना बाजारपेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे; मात्र येथे शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याचा विचार न होता उलट त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.- नामदेवराव जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी