शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दुष्काळमुक्तीचा ‘बीजेएस पॅटर्न’ चार जिल्ह्यांत अंमलबजावणी स्तरावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:44 IST

बुलडाणा : भारतीय जैन संघटना (बीजेएस) व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मेळ साधून बुलडाणा जिल्ह्यात ‘सुजलाम् सुफलाम्’ अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले, त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्याचा बीजेएस पॅटर्न राज्यातील चार जिल्ह्यांत राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्दे‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबविली. गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपीकता वाढविणे, असे कार्य या अभियानातून करण्यात आले.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : भारतीय जैन संघटना (बीजेएस) व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मेळ साधून बुलडाणा जिल्ह्यात ‘सुजलाम् सुफलाम्’ अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले, त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्याचा बीजेएस पॅटर्न राज्यातील चार जिल्ह्यांत राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुषंगाने उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात नियोजन कार्यशाळा नुकत्याच घेण्यात आल्या असून, सप्टेंबर अखेर लातूरमध्ये अभियानाचे उद्घाटन होत आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही संकल्पना भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने बुलडाणा जिल्ह्यात राबविली. धरणातील गाळ उपसा करून धरणाची पाणी पातळी वाढविणे आणि तोच गाळ शेतात टाकल्यानंतर शेताची सुपीकता वाढविणे, असे कार्य या अभियानातून करण्यात आले. त्यामुळे शेतकºयांना समृद्ध करण्याचे मोठे काम या अभियानातून सफल झाले. जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना व प्रशासकीय अधिकारी यांनी राबविलेला पॅटर्न उस्मानाबाद, लातूर, अकोला व वाशिममध्ये राबविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. आता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात २३ व २४ आॅगस्ट रोजी मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यशाळा घेऊन अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले.लातूरमध्ये ३० सप्टेंबरचा साधणार मुहूर्त!लातूर जिल्ह्यासाठी ३० सप्टेंबरचा अभियान राबविण्याच्या दृष्टीने मुहूर्त ठरविण्यात आला आहे. कारण १९९३ मध्ये याच दिवशी किल्लारी भूकंपाचा प्रलय घडून आला होता. त्यामुळे हा दिवस लातूर जिल्हावासीयांसाठी दुर्दैवी दिवस म्हणून स्मरणात आहे; मात्र दुष्काळ मुक्तीसाठीच्या एका शुभ उपक्रमाचा या दिवशी प्रारंभ करून जुन्या दु:खद आठवणी विस्मरणात टाकण्याची या मागे भूमिका आहे.पुढील आठवड्यात अकोला, वाशिमबुलडाण्याच्या पथकाकडून पुढील आठवड्यामध्ये अकोला व वाशिम जिल्ह्यात कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात येईल. अकोला येथे ७ सप्टेंबर व वाशिम येथे ८ सप्टेंबर रोजी कार्यशाळा होणार असून, दोन्ही ठिकाणी मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवलेही उपस्थित राहणार आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती