शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:54 IST

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक घटनेला २00 वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी कोरेगाव भीमाला लाखोच्या संख्येने समाजबांधव येणार होते. याची कल्पना सरकारला असायला हवी होती, नसेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेला जर माहीत असेल तर सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न उपस्थित करून कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. याबाबत तुपकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती; मात्र सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्षे होत आली, तरीही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. सामान्य जनता सरकार विरोधात उघडपणे बोलत आहे, त्यामुळे मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी गावागावांत जातीयवाद निर्माण करून भांडणे लावणे, ही भाजप सरकारची जुनीच खेळी आहे. वास्तविक गावागावांत दलित व मराठा समाजाचे नागरिक गुण्या-गोविंदाने नांदतात. या दोन समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा डाव आहे. २0१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे धृव्रिकरण करून राजकीय फायदा मिळवायचा, हा डाव भाजपचा आहे, हे आता जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.  कोरेगाव भीमाचा खरा इतिहास खोडून काढून, बहुजनांच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, त्यांची माथी भडकावून भांडणे लावायची आणि याची सूत्रे मात्र आपल्या हातात ठेवायची, ही भाजप व त्यांच्या पिलावळांची नीती ओळखून मराठा व दलित समाजातील तरुणांनी जागरुक झाले पाहिजे. देशांतर्गत जातीय दंगली घडवणे हे भाजप सरकारचे विखारी षड्यंत्र आहे. भविष्यात आपआपसात भांडणे करून आपलेच रक्त सांडण्याऐवजी बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रस्थापित पेशवाई विरुद्ध संघर्ष उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. शेवटी जनतेने झालेल्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.       

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhima-koregaonभीमा-कोरेगावRavikant Tupkarरविकांत तुपकर