शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:54 IST

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक घटनेला २00 वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी कोरेगाव भीमाला लाखोच्या संख्येने समाजबांधव येणार होते. याची कल्पना सरकारला असायला हवी होती, नसेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेला जर माहीत असेल तर सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न उपस्थित करून कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. याबाबत तुपकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती; मात्र सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्षे होत आली, तरीही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. सामान्य जनता सरकार विरोधात उघडपणे बोलत आहे, त्यामुळे मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी गावागावांत जातीयवाद निर्माण करून भांडणे लावणे, ही भाजप सरकारची जुनीच खेळी आहे. वास्तविक गावागावांत दलित व मराठा समाजाचे नागरिक गुण्या-गोविंदाने नांदतात. या दोन समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा डाव आहे. २0१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे धृव्रिकरण करून राजकीय फायदा मिळवायचा, हा डाव भाजपचा आहे, हे आता जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.  कोरेगाव भीमाचा खरा इतिहास खोडून काढून, बहुजनांच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, त्यांची माथी भडकावून भांडणे लावायची आणि याची सूत्रे मात्र आपल्या हातात ठेवायची, ही भाजप व त्यांच्या पिलावळांची नीती ओळखून मराठा व दलित समाजातील तरुणांनी जागरुक झाले पाहिजे. देशांतर्गत जातीय दंगली घडवणे हे भाजप सरकारचे विखारी षड्यंत्र आहे. भविष्यात आपआपसात भांडणे करून आपलेच रक्त सांडण्याऐवजी बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रस्थापित पेशवाई विरुद्ध संघर्ष उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. शेवटी जनतेने झालेल्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.       

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhima-koregaonभीमा-कोरेगावRavikant Tupkarरविकांत तुपकर