शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कोरेगाव भीमा येथील दंगलीत भाजपचा हात - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:54 IST

कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक घटनेला २00 वर्षे पूर्ण झाल्याच्या पृष्ठभूमीवर हा विजयी उत्सव साजरा करण्यासाठी कोरेगाव भीमाला लाखोच्या संख्येने समाजबांधव येणार होते. याची कल्पना सरकारला असायला हवी होती, नसेल तर सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करते? पोलीस यंत्रणेला जर माहीत असेल तर सरकारने बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न उपस्थित करून कोरेगाव भीमा येथे घडलेली दंगल ही पूर्वनियोजित व भाजपने घडवून आणलेली असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला; तसेच झालेल्या घटनेचा निषेध करून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहनदेखील केले. याबाबत तुपकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजप सरकारने निवडणुकीत जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती; मात्र सत्तेवर येऊन या सरकारला चार वर्षे होत आली, तरीही आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. सामान्य जनता सरकार विरोधात उघडपणे बोलत आहे, त्यामुळे मुख्य प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी गावागावांत जातीयवाद निर्माण करून भांडणे लावणे, ही भाजप सरकारची जुनीच खेळी आहे. वास्तविक गावागावांत दलित व मराठा समाजाचे नागरिक गुण्या-गोविंदाने नांदतात. या दोन समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचा सरकारचा डाव आहे. २0१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे धृव्रिकरण करून राजकीय फायदा मिळवायचा, हा डाव भाजपचा आहे, हे आता जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.  कोरेगाव भीमाचा खरा इतिहास खोडून काढून, बहुजनांच्या मुलांच्या हाती तलवारी देऊन, त्यांची माथी भडकावून भांडणे लावायची आणि याची सूत्रे मात्र आपल्या हातात ठेवायची, ही भाजप व त्यांच्या पिलावळांची नीती ओळखून मराठा व दलित समाजातील तरुणांनी जागरुक झाले पाहिजे. देशांतर्गत जातीय दंगली घडवणे हे भाजप सरकारचे विखारी षड्यंत्र आहे. भविष्यात आपआपसात भांडणे करून आपलेच रक्त सांडण्याऐवजी बहुजन समाजातील तरुणांनी एकत्र येऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रस्थापित पेशवाई विरुद्ध संघर्ष उभा करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. शेवटी जनतेने झालेल्या घटनेचा शांततेच्या मार्गाने निषेध करावा, असे आवाहनही त्यांनी केले.       

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhima-koregaonभीमा-कोरेगावRavikant Tupkarरविकांत तुपकर