शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

बुलडाणा जिल्ह्यात भाजपचे मेळावे; विरोधकांची आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:37 IST

बुलडाणा: नोटबंदी वर्षपूर्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे काळा दिन पाळण्यात येऊन तहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका तथा जिल्हा स्तरावर चक्क मंडप टाकून नोटबंदी निर्णयाचा विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर या निर्णयाच्या वर्षपूर्तीचे  श्राद्ध घालण्यात आले.

ठळक मुद्देतहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नोटबंदी वर्षपूर्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे काळा दिन पाळण्यात येऊन तहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका तथा जिल्हा स्तरावर चक्क मंडप टाकून नोटबंदी निर्णयाचा विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर या निर्णयाच्या वर्षपूर्तीचे  श्राद्ध घालण्यात आले. देऊळगावराजामध्ये तर चक्क सुमारे ५00 जणांना या श्राद्धाचे जेवणही देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी दिली. दरम्यान, नोटबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात क्रांतिकारक असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे, तर विरोधकांकडून खेळायचे असले, तर खोट्या नोटांशी खेळा, अर्थव्यवस्थेशी नाही, असे टोले लगावण्यात आले.काँग्रेसतर्फे बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मोताळा, सिंदखेड राजा आणि मेहकर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मेहकर येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेजवळून निषेध रॅलीही काढण्यात येऊन भाजपचा निषेध करीत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, नगराध्यक्ष कासम गवळींसह अन्य नेते यात सहभागी झाले होते. तसेच सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करण्यात आली. नोटबंदीदरम्यान मृत पावलेल्या व्यक्तींना मेहकरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन काळा दिवस पाळण्यात आला. सोबतच नोटबंदीच्या काळात मृत पावलेल्या दीडशे व्यक्तींना चिखलीतही श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच भाजपच्या धोरणाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.  चिखलीध्ये आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा, चिखली, मेहकरमध्ये आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर चक्क काही ठिकाणी पेंडॉल टाकून नोटबंदीचे रीतसर श्राद्ध घातले. देऊळगावराजा येथील आंदोलनादरम्यान, जवळपास ५00 जणांना या श्राद्धाचे जेवणही देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी सांगितले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे भाजप सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या दृष्टीने एक विनाशकारी पाऊल होते, असे स्पष्ट केले. ज्या कारणामुळे ती करण्यात आली, त्यापैकी एकही बाब साध्य झाली नसल्याचे ते म्हणाले.

दावे प्रतिदावेएकीकडे भाजपने संपूर्ण जिल्ह्यात नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा तथा तालुका स्तरावर मेळावे घेऊन यामुळे आर्थिक क्रांती झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने खोट्या नोटांचे पाकीट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. नोटांशी खेळायचे असले, तर या नोटांशी खेळा, भारतीय अर्थव्यवस्थेशी खेळू नका, असा मानस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त करीत हे पाकीट पाठविले आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिक क्रांती झाल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे हा निर्णय अर्थव्यवस्था आणि जनतेसाठी विनाशकारी असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केल्या गेला आहे.

टॅग्स :Note BanनोटाबंदीBJPभाजपाcongressकाँग्रेस