शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

विदर्भ राज्यासाठी भाजपला आत्मबळाची गरज - आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:43 IST

बुलडाणा : विदर्भ राज्याबाबत जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ आत्मबळ यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व नेते मंडळी येत असली तरी भाजपचे आमदार त्यावर येत नाही. त्यामुळे त्यांना  वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा मांडण्यासाठी आत्मबळ यावे, तथा विदर्भवादी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्येही हे आत्मबळ यावे, असा टोला काटोलचे  भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बुलडाणा येथे लगावला. दरम्यान, प्रारंभीच्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देप्रारंभीच्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यामुळे या निवडणुकीत भाजपला बसेल फटका

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विदर्भ राज्याबाबत जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ आत्मबळ यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व नेते मंडळी येत असली तरी भाजपचे आमदार त्यावर येत नाही. त्यामुळे त्यांना  वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा मांडण्यासाठी आत्मबळ यावे, तथा विदर्भवादी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्येही हे आत्मबळ यावे, असा टोला काटोलचे  भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी बुलडाणा येथे लगावला. दरम्यान, प्रारंभीच्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसेल, असेही ते म्हणाले.स्थानिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विदर्भ आत्मबळ यात्रेनिमित्त ते बुलडाण्यात आले होते. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे धनंजय देशमुख, जवाहर चरडे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील ६२ मतदार संघ पालथे घातले असून, पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११ जिल्ह्यात ते जात असून, त्यानुषंगाने बुलडाणा येथे ते  आले होते.वेगळ्य़ा विदर्भासंदर्भात जोवर राजकीय इच्छा शक्ती निर्माण होणार नाही, तोवर विदर्भ राज्य निर्मितीला बळ मिळणार नाही, असेही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत विदर्भातील ६६ मतदार संघांपैकी ४४ मतदार संघांमध्ये भाजपला नागरिकांनी कौल दिला होता. वेगळ्य़ा विदर्भाच्या मुद्द्यासह दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता भाजपाने जर केली नाही तर आगामी निवडणुकांत याचे भाजपला दुष्परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. वेगळ्य़ा विदर्भासाठी राजकीय मतभेद विसरून तथा विविध सामाजिक, युवा, डॉक्टर, महिला, शेतकरी, तंत्रज्ञांच्या संघटनांनी एकत्र येऊन यासाठी लढा उभारावा, असे ते म्हणाले.  सध्याचे सरकार हलेले ऐवढे संख्याबळ नक्कीच आहे, असे त्यांनी सांगितले.शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करणार्‍या योजना सरकारने आणाव्यात, असे सांगून कृषी, महसूल विभागात शेतकर्‍यांप्रती संवेदनशीलता राहिली नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागासाठी विशेष तरतुदींची आज गरज आहे. भाजपाने निवडणुकीच्या वेळी आश्‍वासित केलेल्या योजना मार्गी लावल्यास गाडी रुळावर येण्यास मदत होईल. आश्‍वासने पूर्ण होत नसल्यामुळे जनमानसात रोष वाढत आहे, असे ते म्हणाले. सेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्दय़ावर त्यांना विचारणा केली असता, गले की हड्डी निघाली, असे माफक उत्तर त्यांनी दिले.    पक्षशिस्तीच्या मुद्दय़ावर आपणांस पक्षाने बजावलेल्या नोटीसला आपण उत्तर दिले नाही. मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्राचे उत्तर अद्याप मिळाले नाही. त्यामुळे नोटीसला उत्तर देण्यात तूर्तास आपण बाध्य नाही, असेही ते म्हणाले.

पूर्ण होतील अशीच आश्‍वासने द्यावी!मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात रोजगार निर्मिती मोठय़ा प्रमाणावर होईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात विदर्भाच्या दृष्टीने विचार करता फक्त दहा हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात येणार होती. पैकी काहीच मिळाली नाही. आताही रोजगार निर्मितीबाबत त्यांनी आश्‍वासने दिली आहेत; पण साडेचार वर्षात जी ते पूर्ण करू शकले नाहीत. ते आता काय करणार, त्यामुळे पूर्ण होतील तेवढीच आश्‍वासने त्यांनी द्यावीत, असे सांगण्यासही आ. देशमुख विसरले नाहीत.

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखbuldhanaबुलडाणा