शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
3
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
4
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
5
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
6
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
7
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
8
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
9
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
10
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
11
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
12
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
13
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
14
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
15
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
16
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
17
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
18
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
19
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
20
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र

भाजपाने विदर्भातील जनतेला फसविले - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:35 IST

भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. 

ठळक मुद्दे११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. स्थानिक पत्रकार भवन येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अँड.सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा, तेजराव मुंडे,  रंजना मामर्डे, समाधान कणखर आदी उपस्थित होते. चटप पुढे म्हणाले, की स्वतंत्र विदर्भ  राज्य देऊ, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जातून मुक्त करू, शेतीमालास उत्पादन खर्च अधिक  पन्नास टक्के नफा एवढे हमीभाव देऊ, शेतकर्‍यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून त्यांना मरू  देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त करू, विजेचे बिल कमी करून लोडशेडिंग संपवू, अशी  अनेक आश्‍वासने भाजपाच्या नेत्यांनी भाषणामधून व जाहीरनाम्यातून विदर्भाच्या जनतेला  निवडणुकीच्या वेळी दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्‍वासन वैदर्भीय जनतेचे व शे तकर्‍यांचे भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पूर्ण केले नाही. उलट विदर्भ राज्य देण्याच्या  तसेच शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याच्या आश्‍वासनापासून ते पळ काढत आहे. तीन वर्षांत  आश्‍वासन पूर्ण न करताच नव्याने २0१९ मध्ये येणार्‍या निवडणुकीची जोरदार तयारी भाज पाचे नेते करीत आहेत.भाजपा पक्षाला जनतेला दिलेल्या आश्‍वासनापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे म्हणून ते पुन्हा  निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. दिलेले आश्‍वासन ‘चुनावी जुमला’ होता  किंवा विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून अमित शहांचे वक्तव्य तर विदर्भ प्र थम सक्षम करू,  नितीन गडकरींचे वक्तव्य म्हणजे विदर्भातील जनतेचे, शेतकर्‍यांचे  बेरोजगारांचे, भाजपा नेत्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे आता आरपारच्या लढाईची सुरुवात करून ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे  हिवाळी अधिवेशन नागपूरला भरत आहे. त्यावर बहिष्कार घालून पहिल्याच दिवशी ११  डिसेंबर रोजी संपूर्ण विदर्भात बंद पाळण्यात येणार आहे. व्यापार्‍यांनी व्यापार बंद करून शे तकर्‍यांनी शेतीची कामे बंद करून, संप करून, बेरोजगारांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी  शाळा, कॉलेजमध्ये संप पाळून, ११ डिसेंबरच्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन  विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात येत आहे.११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची तयारी जोरात सुरू झाली आहे. विदर्भातील अकराही  जिल्ह्यांतील जिल्हा बैठका झाल्या असून, संपूर्ण विदर्भातील तालुकास्तरीय बैठका सुरू  आहेत. सर्व विदर्भवादी संघटनांना, सर्व व्यापारी संघटनांना, शाळा, कॉलेज, इतर प्र ितष्ठानांना भेटून या बंद आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. विदर्भ  माझा, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ गण परिषद, जनसुराज्य पार्टी आदी विदर्भवादी  संघटनांनी ११ डिसेंबर रोजी या विदर्भ बंदच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.  मागील वर्षी मुंबईत भरलेल्या अधिवेशन काळात एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस,  राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन त्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव आणून विदर्भ राज्याला  विरोध केला होता. त्याच धर्तीवर विदर्भातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर सर्व  पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र विदर्भ राज्याचे सर्मथन करावे व या  आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात येत असल्याचे चटप  यांनी यावेळी सांगितले. -

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटप