शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने विदर्भातील जनतेला फसविले - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:35 IST

भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. 

ठळक मुद्दे११ डिसेंबरला विदर्भ बंदची हाक हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी विदर्भ जनतेला दिलेले  एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. उलट विदर्भ सक्षम नाही, त्याला प्रथम सक्षम करू, असे  तथ्यहीन वक्तव्य करून पळवाट काढत आहेत. एकप्रकारे भाजपाने विदर्भातील जनतेला  फसविले, असा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अँड.वामनराव चटप यांनी  केला. स्थानिक पत्रकार भवन येथे २२ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अँड.सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा, तेजराव मुंडे,  रंजना मामर्डे, समाधान कणखर आदी उपस्थित होते. चटप पुढे म्हणाले, की स्वतंत्र विदर्भ  राज्य देऊ, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जातून मुक्त करू, शेतीमालास उत्पादन खर्च अधिक  पन्नास टक्के नफा एवढे हमीभाव देऊ, शेतकर्‍यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून त्यांना मरू  देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त करू, विजेचे बिल कमी करून लोडशेडिंग संपवू, अशी  अनेक आश्‍वासने भाजपाच्या नेत्यांनी भाषणामधून व जाहीरनाम्यातून विदर्भाच्या जनतेला  निवडणुकीच्या वेळी दिले होते; परंतु त्यापैकी एकही आश्‍वासन वैदर्भीय जनतेचे व शे तकर्‍यांचे भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारने पूर्ण केले नाही. उलट विदर्भ राज्य देण्याच्या  तसेच शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याच्या आश्‍वासनापासून ते पळ काढत आहे. तीन वर्षांत  आश्‍वासन पूर्ण न करताच नव्याने २0१९ मध्ये येणार्‍या निवडणुकीची जोरदार तयारी भाज पाचे नेते करीत आहेत.भाजपा पक्षाला जनतेला दिलेल्या आश्‍वासनापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे म्हणून ते पुन्हा  निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले आहेत. दिलेले आश्‍वासन ‘चुनावी जुमला’ होता  किंवा विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून अमित शहांचे वक्तव्य तर विदर्भ प्र थम सक्षम करू,  नितीन गडकरींचे वक्तव्य म्हणजे विदर्भातील जनतेचे, शेतकर्‍यांचे  बेरोजगारांचे, भाजपा नेत्यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे आता आरपारच्या लढाईची सुरुवात करून ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे  हिवाळी अधिवेशन नागपूरला भरत आहे. त्यावर बहिष्कार घालून पहिल्याच दिवशी ११  डिसेंबर रोजी संपूर्ण विदर्भात बंद पाळण्यात येणार आहे. व्यापार्‍यांनी व्यापार बंद करून शे तकर्‍यांनी शेतीची कामे बंद करून, संप करून, बेरोजगारांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी  शाळा, कॉलेजमध्ये संप पाळून, ११ डिसेंबरच्या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन  विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात येत आहे.११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची तयारी जोरात सुरू झाली आहे. विदर्भातील अकराही  जिल्ह्यांतील जिल्हा बैठका झाल्या असून, संपूर्ण विदर्भातील तालुकास्तरीय बैठका सुरू  आहेत. सर्व विदर्भवादी संघटनांना, सर्व व्यापारी संघटनांना, शाळा, कॉलेज, इतर प्र ितष्ठानांना भेटून या बंद आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. विदर्भ  माझा, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ गण परिषद, जनसुराज्य पार्टी आदी विदर्भवादी  संघटनांनी ११ डिसेंबर रोजी या विदर्भ बंदच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.  मागील वर्षी मुंबईत भरलेल्या अधिवेशन काळात एकमेकांच्या विरोधात लढणारे काँग्रेस,  राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊन त्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव आणून विदर्भ राज्याला  विरोध केला होता. त्याच धर्तीवर विदर्भातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर सर्व  पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वतंत्र विदर्भ राज्याचे सर्मथन करावे व या  आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात येत असल्याचे चटप  यांनी यावेळी सांगितले. -

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटप