शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही फसवणूक केली - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:56 IST

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विश्रामगृहावर शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भातील जनतेचे प्रबोधन करण्याकरीता पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशा दोन यात्रा काढण्यात आल्या आहेत. २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा शनिवारी बुलडाणा येथे पोहचली असता विश्राम भवनावर अ‍ॅड. वामनराव चटप यांनी संवाद साधला. भाजप सरकारच्या हातात असतानाही स्वतंत्र विदर्भसाठी हालचाली होत नाहीत, विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन हे सरकार विसरले असल्याचा आरोप चटप यांनी यावेळी केला. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये विदर्भातील १० लोकसभा व ६२ विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी चार विदर्भ वादी संघटना व पाच पक्ष एकत्र आले आहेत. विदर्भाच्या विकासासाठी लोकसभा व विधानसभेची तयारी करण्यात येत असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या विरोधात ही निवडणुक लढविणार आहे, असे अ‍ॅड. वामनराव चटप यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, घनश्याम पुरोहित, अ‍ॅड. सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWamanrao Chatapवामनराव चटप