शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही फसवणूक केली - वामनराव चटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 13:56 IST

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अ‍ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विश्रामगृहावर शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भातील जनतेचे प्रबोधन करण्याकरीता पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशा दोन यात्रा काढण्यात आल्या आहेत. २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा शनिवारी बुलडाणा येथे पोहचली असता विश्राम भवनावर अ‍ॅड. वामनराव चटप यांनी संवाद साधला. भाजप सरकारच्या हातात असतानाही स्वतंत्र विदर्भसाठी हालचाली होत नाहीत, विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन हे सरकार विसरले असल्याचा आरोप चटप यांनी यावेळी केला. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये विदर्भातील १० लोकसभा व ६२ विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी चार विदर्भ वादी संघटना व पाच पक्ष एकत्र आले आहेत. विदर्भाच्या विकासासाठी लोकसभा व विधानसभेची तयारी करण्यात येत असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या विरोधात ही निवडणुक लढविणार आहे, असे अ‍ॅड. वामनराव चटप यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, घनश्याम पुरोहित, अ‍ॅड. सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWamanrao Chatapवामनराव चटप