शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:13 IST

कोरोनामूळे साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

- जयदेव वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: दिवसेंदिवस महाराष्ट्रभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे परंपरेनुसार २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घट मांडणी रद्द करण्यात आल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ‘लोकमत’ला आज दिली. बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवड येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. कुठल्याही दृकश्राव्य साधनांचा शोध त्यावेळी नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवड ला यायचे. या मांडणीचे भाकीत ऐकायचे. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करायचे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. या घटमांडणी वर महाराष्ट्रातील शेतकºयांची भिस्त असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून सुरू असणारी ही परंपरा आजही त्याच विश्वासाने जपल्या गेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, करंजी ,भजा ,वडा इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या गटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसºया दिवशी सकाळी सुर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेती विषयक, राजकारण , नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील याबाबत जे अंदाज वर्तविले जातात. तर पृथ्वीवर येणाºया संकटाची याविषयी वाणीतून व्यक्त केली जाते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवित आहेत परंतु यावर्षी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे . महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ जाहीर करण्यात आले आहेत . तर जमावबंदी ला मनाई आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमा होऊ नये. यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ मांडणी रद्दचा निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी भेंडवडला येवू नये

भेंडवडची मांडणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ एप्रिलरोजी घट मांडणी केली जाणार नाही. आणि २७ एप्रिल रोजी पहाटे त्याचे भाकीत सुद्धा करण्यात येणार नाही. त्यामुळे परिसरातील कोणत्याही शेतकºयांनी अथवा नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये. आपल्या घरातच राहून सुरक्षित राहावे. कोरोना सारख्या महामारी ला घरात बसूनच तोंड द्यावे. आणि शासनाला सहकार्य करण्याचे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस