शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:13 IST

कोरोनामूळे साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

- जयदेव वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: दिवसेंदिवस महाराष्ट्रभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे परंपरेनुसार २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घट मांडणी रद्द करण्यात आल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ‘लोकमत’ला आज दिली. बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवड येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. कुठल्याही दृकश्राव्य साधनांचा शोध त्यावेळी नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवड ला यायचे. या मांडणीचे भाकीत ऐकायचे. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करायचे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. या घटमांडणी वर महाराष्ट्रातील शेतकºयांची भिस्त असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून सुरू असणारी ही परंपरा आजही त्याच विश्वासाने जपल्या गेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, करंजी ,भजा ,वडा इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या गटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसºया दिवशी सकाळी सुर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेती विषयक, राजकारण , नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील याबाबत जे अंदाज वर्तविले जातात. तर पृथ्वीवर येणाºया संकटाची याविषयी वाणीतून व्यक्त केली जाते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवित आहेत परंतु यावर्षी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे . महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ जाहीर करण्यात आले आहेत . तर जमावबंदी ला मनाई आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमा होऊ नये. यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ मांडणी रद्दचा निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी भेंडवडला येवू नये

भेंडवडची मांडणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ एप्रिलरोजी घट मांडणी केली जाणार नाही. आणि २७ एप्रिल रोजी पहाटे त्याचे भाकीत सुद्धा करण्यात येणार नाही. त्यामुळे परिसरातील कोणत्याही शेतकºयांनी अथवा नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये. आपल्या घरातच राहून सुरक्षित राहावे. कोरोना सारख्या महामारी ला घरात बसूनच तोंड द्यावे. आणि शासनाला सहकार्य करण्याचे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस