शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:13 IST

कोरोनामूळे साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

- जयदेव वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: दिवसेंदिवस महाराष्ट्रभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे परंपरेनुसार २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घट मांडणी रद्द करण्यात आल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ‘लोकमत’ला आज दिली. बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवड येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. कुठल्याही दृकश्राव्य साधनांचा शोध त्यावेळी नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवड ला यायचे. या मांडणीचे भाकीत ऐकायचे. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करायचे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. या घटमांडणी वर महाराष्ट्रातील शेतकºयांची भिस्त असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून सुरू असणारी ही परंपरा आजही त्याच विश्वासाने जपल्या गेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, करंजी ,भजा ,वडा इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या गटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसºया दिवशी सकाळी सुर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेती विषयक, राजकारण , नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील याबाबत जे अंदाज वर्तविले जातात. तर पृथ्वीवर येणाºया संकटाची याविषयी वाणीतून व्यक्त केली जाते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवित आहेत परंतु यावर्षी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे . महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ जाहीर करण्यात आले आहेत . तर जमावबंदी ला मनाई आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमा होऊ नये. यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ मांडणी रद्दचा निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी भेंडवडला येवू नये

भेंडवडची मांडणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ एप्रिलरोजी घट मांडणी केली जाणार नाही. आणि २७ एप्रिल रोजी पहाटे त्याचे भाकीत सुद्धा करण्यात येणार नाही. त्यामुळे परिसरातील कोणत्याही शेतकºयांनी अथवा नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये. आपल्या घरातच राहून सुरक्षित राहावे. कोरोना सारख्या महामारी ला घरात बसूनच तोंड द्यावे. आणि शासनाला सहकार्य करण्याचे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस