शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

भेंडवडची घटमांडणी रद्द; ३५० वर्षांची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:13 IST

कोरोनामूळे साडेतीनशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे.

- जयदेव वानखडे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद: दिवसेंदिवस महाराष्ट्रभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड येथे परंपरेनुसार २६ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होणारी घट मांडणी रद्द करण्यात आल्याची माहिती चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ‘लोकमत’ला आज दिली. बुलढाणा जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम भेंडवड येथे साडेतीनशे वषार्पासून येथे घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली. कुठल्याही दृकश्राव्य साधनांचा शोध त्यावेळी नव्हता. त्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय तृतीयेला भेंडवड ला यायचे. या मांडणीचे भाकीत ऐकायचे. त्यावरून वर्षभरातील शेतीची पेरणी आणि पीक पाण्याचे नियोजन करायचे. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे. या घटमांडणी वर महाराष्ट्रातील शेतकºयांची भिस्त असते. त्यामुळे पिढ्यानपिढ्यापासून सुरू असणारी ही परंपरा आजही त्याच विश्वासाने जपल्या गेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर. घागरीवर पुरी, पापड, सांडोळी, कुरडी, करंजी ,भजा ,वडा इत्यादी खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात. त्यानंतर रात्रभर या गटामध्ये कोणीही फिरकत नाही. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसºया दिवशी सकाळी सुर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेती विषयक, राजकारण , नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस पाणी आणि पीक पाणी कसे राहील याबाबत जे अंदाज वर्तविले जातात. तर पृथ्वीवर येणाºया संकटाची याविषयी वाणीतून व्यक्त केली जाते. सध्या चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज ही परंपरा चालवित आहेत परंतु यावर्षी कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव जगभर झाल्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक घटकावर त्याचा परिणाम होत आहे . महाराष्ट्रभर लॉकडाऊन आहे . आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कलम १८८ जाहीर करण्यात आले आहेत . तर जमावबंदी ला मनाई आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामात कुठलीही बाधा येऊ नये. आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी जमा होऊ नये. यासाठी भेंडवळ येथील पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी भेंडवळ मांडणी रद्दचा निर्णय घेतला आहे.

शेतकºयांनी भेंडवडला येवू नये

भेंडवडची मांडणी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २६ एप्रिलरोजी घट मांडणी केली जाणार नाही. आणि २७ एप्रिल रोजी पहाटे त्याचे भाकीत सुद्धा करण्यात येणार नाही. त्यामुळे परिसरातील कोणत्याही शेतकºयांनी अथवा नागरिकांनी या ठिकाणी येऊ नये. आपल्या घरातच राहून सुरक्षित राहावे. कोरोना सारख्या महामारी ला घरात बसूनच तोंड द्यावे. आणि शासनाला सहकार्य करण्याचे करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस