शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

खोट्या प्रचाराचे मुद्दे आता जनतेच्या लक्षात येतात : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:01 IST

जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे.

अनिल उंबरकर 

शेगाव ( बुलढाणा) : जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही माहिती दिली. त्यामध्ये केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, याच दिवशी मागे घेतल्याने १९ नाेव्हेंबर हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुका आल्या की भाजपकडून मूळ मुद्यांना बगल दिली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीआरपीएफच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्याचे काय झाले, हे अद्यापही जनतेसमोर आलेले नाही. अरुणाचल, लद्दाख सीमांमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. त्याबद्दल बोलायलाही ५६ इंच छाती असल्याचा आव आणणारे तयार नाहीत, असे सांगत पटोले यांनी अनेक बाबी आता जनतेच्या लक्षात येत असल्याने परिवर्तन होणार असल्याचे म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने आरोप केले जातात. त्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र आणि त्यांना मिळणारी ६० रुपये महिना पेंशन कशासाठी होती, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे, विचाराचा प्रतिकार विचारांनी करून देशात लोकशाही असल्याची प्रचीती संबंधितांनी द्यावी, असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा