शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

खोट्या प्रचाराचे मुद्दे आता जनतेच्या लक्षात येतात : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:01 IST

जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे.

अनिल उंबरकर 

शेगाव ( बुलढाणा) : जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही माहिती दिली. त्यामध्ये केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, याच दिवशी मागे घेतल्याने १९ नाेव्हेंबर हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुका आल्या की भाजपकडून मूळ मुद्यांना बगल दिली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीआरपीएफच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्याचे काय झाले, हे अद्यापही जनतेसमोर आलेले नाही. अरुणाचल, लद्दाख सीमांमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. त्याबद्दल बोलायलाही ५६ इंच छाती असल्याचा आव आणणारे तयार नाहीत, असे सांगत पटोले यांनी अनेक बाबी आता जनतेच्या लक्षात येत असल्याने परिवर्तन होणार असल्याचे म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने आरोप केले जातात. त्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र आणि त्यांना मिळणारी ६० रुपये महिना पेंशन कशासाठी होती, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे, विचाराचा प्रतिकार विचारांनी करून देशात लोकशाही असल्याची प्रचीती संबंधितांनी द्यावी, असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा