शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खोट्या प्रचाराचे मुद्दे आता जनतेच्या लक्षात येतात : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:01 IST

जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे.

अनिल उंबरकर 

शेगाव ( बुलढाणा) : जनतेला भूलथापा देऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने गेल्या आठ वर्षांच्या काळात किती फसवणूक केली, ही बाब आता जनतेच्या लक्षात येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेच्या निमित्ताने देशात परिवर्तनाला सुरुवात झाली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनीही माहिती दिली. त्यामध्ये केंद्र शासनाने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, याच दिवशी मागे घेतल्याने १९ नाेव्हेंबर हा दिवस किसान दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुका आल्या की भाजपकडून मूळ मुद्यांना बगल दिली जाते. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीआरपीएफच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्याचे काय झाले, हे अद्यापही जनतेसमोर आलेले नाही. अरुणाचल, लद्दाख सीमांमध्ये चीनने घुसखोरी केली आहे. त्याबद्दल बोलायलाही ५६ इंच छाती असल्याचा आव आणणारे तयार नाहीत, असे सांगत पटोले यांनी अनेक बाबी आता जनतेच्या लक्षात येत असल्याने परिवर्तन होणार असल्याचे म्हणाले.

काँग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने आरोप केले जातात. त्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र आणि त्यांना मिळणारी ६० रुपये महिना पेंशन कशासाठी होती, याचे उत्तर संबंधितांनी द्यावे, विचाराचा प्रतिकार विचारांनी करून देशात लोकशाही असल्याची प्रचीती संबंधितांनी द्यावी, असेही पटोले म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा