शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
4
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
5
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
6
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
7
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
8
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
9
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
10
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
11
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
12
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
13
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
14
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
15
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
16
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
17
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
18
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
19
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
20
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनही शेतकरी कर्जमाफीला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:59 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘हेअर कट’द्वारे बँकांकडूनशेतकरी कर्जमाफीला हातभार लागणार असून आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर कर्जमुक्ती मिळालेल्याकाही शेतकऱ्यांच्या खात्यात तुलनेने कमी रक्कम जमा झाल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब स्पष्ट झाली. दरम्यान, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पोटी ९५ कोटी ६६ लाख ५६ हजार ८६९ रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती आहे.राज्य शासन शेतकºयांच्या कर्जाची रक्कम बँकांना देत आहे. त्यामुळे बँकामधील शेतकºयांची जी खाती ३० सप्टेंबर २०१९, ३१ मार्च २०१८ आणि ३१ मार्च २०१७ रोजी एनपीएमध्ये (नॉन प्रॉडक्टीव्ह असेट्स (अनुत्पादक जिंदगी)) गेली आहेत. त्या खात्यांवरील थकित कर्जाच्या रकमेपैकी अनुक्रमे १५ टक्के, ३० टक्के आणि ४५ टक्के रक्कम ही बँकांना सोसावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण केले व त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली परंतू ती प्रत्यक्षात झालेल्या कर्जमाफीच्या तुलनेत कमी असली तरी त्याबाबत शेतकºयांनी घाबरून जावू नये.ती रक्कम बँका सोसणार असल्याचे असे बँकिंग क्षेत्रातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. यासंदर्भात राज्य शासन आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीमध्ये एक करारही झालेला आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एक लाख ७९ हजार ६६६ शेतकºयांची कर्जखाती अपलोड झालेली असून यापैकी एक लाख ४६ हजार ८०० शेतकºयांच्या कर्जखात्याचे विशिष्ट क्रमांक उपलब्ध झालेले ओत. दरम्यान, यापैकी एक लाख दोन हजार ९४० खात्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले आहे तर ४३ हजार ८५९ शेतकरी कर्ज खात्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे.दुसरीकडे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या १६ हजार १६० शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले असून पैकी १५ हजार ६५ शेतकºयांच्या कर्जमाफीचे ९५ कोटी ६६ लाख रुपये जिल्हा बँकेकडे वर्ग झाले आहेत.

काय आहे ‘हेअर कट’!राज्य शासन शेतकºयांच्या कर्जापोटी बँकांना पैसे देणार आहे. त्यामुळे बँकांचा एनपीए कमी होऊन बँकांची आर्थिक सक्षमता वाढले. परिणामी ज्या शेतकºयांची खाती ही ३० सप्टेंबर २०१९ ला एनपीएत गेली त्या शेतकºयाच्या कर्जापैकी १५ टक्के रक्कम बँकेला सोसावी लागणार आहे. ३१ मार्च २०१८ रोजी खाते एनपीए झालेले अल्यास बँकेला ३० टक्के तर ३१ मार्च २०१७ ला खाते एनपीए झाले असल्यास ४५ टक्के रक्कम ही बँकेला सोसावी लागणार आहे. यासंदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समिती आणि राज्य शासनास यांच्यात करार झालेला आहे. वाणगी दाखल सांगायचे झाल्यास जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा संचित तोटा शेतकरी कर्जमाफी माफीची रक्कम बँकेस मिळाल्यामुळे १०० कोटींनी कमी होणार आहे. वसूल न होणारी रक्कम बँकांना मिळत असल्याने बँकांनीही या ‘हेअर कट’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीच्या रकमेपेक्षा कमी रक्कम जमा झाली असल्यास त्यांनी घाबरून जावू नये, ही तफावतीची रक्कम बँकांकडूनच भरण्यात येणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीbankबँक