शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

भूजल पातळीत सरासरी दीड मीटरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 16:45 IST

बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: वाषिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याची भुजल पातळी १.३९ मिटरने वाढल्याचे स्पष्ट झाले असले तरी देऊळगाव राजा, लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यात मात्र घट झाल्याचे चित्र आहे.वर्षभरात साधारणत: चार वेळा भूजल पातळीची तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाकडून करण्यात येते. त्यानुषंगाने ही तपासणी करण्यात आली होती. यामध्ये बुलडाणा, चिखली, मलकापूर, नांदुरा, मोताळा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात भूजल पातळीत वाढ झालेली आहे. प्रामुख्याने १.११ मीटर ते ७.६० मिटर दरम्यान ही वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहीरींची पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी स्पष्ट झाली आहे. मात्र देऊळगाव राजा तालुक्याची भूजल पातळी ही उणे ०.०८, लोणारची उणे ०.१५ आणि सिंदखेड राजाची उणे ०.४५ मीटरने घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात उन्हान्यात प्रसंगी पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात होणाऱ्या भुजल पातळीच्या तपासणीत सरासरी भुजल पातळीची अद्ययावत माहिती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष उन्हाळ््यात कोणत्या तालुक्यात प्रसंगी पाणीटंचाी निर्माण होईल, याचा अंदाज बांधणे शक्य होईल, असा अंदाज सुत्रांनी व्यक्त केला. एकंदरीत परिस्थिती पाहता जिल्ह्यात यावर्षी फारसी टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काही भागाक अ‍ॅक्वीफोर (जलधर खडक) नसल्याने त्या भागात टंचाईची शक्यता नाकारता येत नाही.

टंचाई आराखडा ४.७३ कोटींचाजिल्ह्यात परतीच्या पावसाने यंदा उच्चांक गाठल्यामुळे पाणीटंचाईची शक्यता कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा हा ४.७३ कोटींच्या घरात आहे. गतवर्षी हाच टंचाई कृती आराखडा सातत्याने वाढत होता. गेल्या वर्षी तब्बल ४९ कोटी ३३ लाख रुपयांचा खर्च यावर झाला आहे. दरम्यान आॅक्टोबर २०१९ ते जून २०२० पर्यंतचा यंदाचा टंचाई कृती आराखडा पुर्णत्वास गेला असून जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यावर शिक्का मोर्तब केले आहे. डिसेंबर अखेर जिल्ह्यातील २१ गावात टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचया २६ योजना प्रस्तावीत करण्यात आल्या आहेत.

एप्रिल-जूनमध्ये ३३६ गावात टंचाईजानेवारी मार्च दरम्यान जिल्ह्यातील ९२ गावात पाणीटंचाईची शक्यता आहे. दरम्यान, एप्रील ते जून अखेरपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता ही ३३६ गावात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यादृ्ष्टीने प्रशासनाने नियोजन केलेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी