शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

जळगाव तालुक्यात सरासरी ६६२ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:50 IST

जळगाव जामोद : तालुक्यात सरासरी पाऊस ६८३ मि.मी. अपेक्षित आहे. एवढा पाऊस झाला म्हणजे तालुक्यात पुरेसा पाऊस झाला अशी महसूल विभागाच्या लेखी नोंद घेतली जाते. मात्र यंदा परतीच्या पावसानंतर जळगाव तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६६२ मि.मी. झाली असून अपेक्षित सरासरीपेक्षा फक्त २१ मिमी.ने कमी आहे.

ठळक मुद्देधरणे, विहिरींची पातळी खालावलेलीचशेतकरी चिंतातुर

नानासाहेब कांडलकर । लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यात सरासरी पाऊस ६८३ मि.मी. अपेक्षित आहे. एवढा पाऊस झाला म्हणजे तालुक्यात पुरेसा पाऊस झाला अशी महसूल विभागाच्या लेखी नोंद घेतली जाते. मात्र यंदा परतीच्या पावसानंतर जळगाव तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६६२ मि.मी. झाली असून अपेक्षित सरासरीपेक्षा फक्त २१ मिमी.ने कमी आहे. असे असूनही तालुक्यातील गोडाडा, राजुरा व धानोरा ही तीन धरणे व विहिरींची पातळी प्रचंड खालावलेली असल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगाम कसा करावा, अशी चिंता शेतकरी वर्गाला लागली आहे.जळगाव तालुक्यात पाच ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहे. या यंत्रांच्या नोंदीनुसार यावर्षी जून ते ऑक्टेाबर या पाच महिन्यात जळगावात ७९३ मि.मी. पावसाची नोंद झाली म्हणजे अपेक्षित सरासरी पावसापेक्षा ११0 मि.मी.ने जळगावात जास्त पाऊस आहे. असे असले तरी जळगाव शहराला लागून असलेल्या गोडाडा धरणात ५0 टक्क्यापेक्षाही कमी पाणी आहे. याच धरणावरुन जळगावकरांची तहान भागविली जाते. अपेक्षित सरासरीपेक्षा जळगाव नगरात जास्त पाऊस होवूनही धरण तहानलेले का? याचा शोध घेतला असे लक्षात आले की, सातपुडा पर्वतराजीत पाऊस न झाल्याने धरणात जलसाठा अत्यल्प आहे. तसेच विहिरींची पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. अशी विसंगत स्थिती का निर्माण झाली असावी याचे संशोधन भुजल सर्वेक्षण विभागाने करणे गरजेचे आहे.जामोद सर्कलमध्ये ६२७ मि.मी., वडशिंगी सर्कलमध्ये ६५३ मि.मी., आसलगाव सर्कल ६२५ मि.मी. तर पिंपळगाव काळे सर्कलमध्ये ६१३ मि.मी. पाऊस झाला. अर्थात या चारही सर्कलमधील पाऊस महसूल विभागाने निश्‍चीत केलेल्या सरासरी ६८३ मि.मी. पावसापेक्षा ३0 ते ७0 मि.मी.ने कमी आहे. शासनाच्या दरबारी मात्र फक्त जळगाव मापन केंद्रातील पाऊसच गृहीत धरला जातो. या पृष्ठभूमीवर जळगाव तालुक्यात सरासरीपेक्षाही जास्त पर्जन्यमान आहे असा शेरा मारला जातो. वास्तव स्थिती मात्र यापेक्षा वेगळी आहे. विहिरींची पाण्याची पातळी वाढली नाही. धरणात फक्त ५0 टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे हे वास्तव समोर आले पाहिजे.सन २0१३ मध्ये तालुक्यात सर्वाधिक सरासरी पाऊस ९३४ मि.मी. झाला होता. तर सन २0१४ मध्ये फक्त ६२७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सन २0१५ हे वर्ष साधारण बरे राहिले. यावर्षी ७0६ मि.मी.पाऊस झाल्याने धरण व विहिरींची स्थिती चांगली होती. सन २0१६ मध्ये म्हणजे मागील वर्षी पावसाने पुन्हा कमी राहिली. ६३२ मि.मी. वरच पाऊस थांबला. यावर्षी सरासरी नोंद ६६२ मि.मी. झाली असली तरी जळगाव वगळता जामोद, वडशिंगी, आसलगाव व पिंपळगाव काळे येथे कमी पाऊस आहे. भविष्यात पाणी टंचाई जाणवेल सोबतच शेतकर्‍यांचा रब्बी हंगाम सुध्दा होणार नाही.

पूर्णा नदीला पूर नाही    दरवर्षी पूर्णा नदीला एक तरी पूर जातो. या नदीला पूर गेल्यानंतर विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. यावर्षी मात्र पूर्णा नदीला एकही पूर गेला नाही. तसेच नदी काठोकाठ भरुन काही दिवस वाहत होती असेही चित्र निर्माण झाले नाही. त्यामुळे विहिरींची पातळी अत्यंत कमी आहे. अमरावती व अकोला जिल्ह्यात जरी पाऊस झाला तरी पूर्णा नदीला पूर येतो. याचा अर्थ या दोन जिल्ह्यातही पुरेसा पाऊस झाला नसावा असा शेतकर्‍यांचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस