शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 23:07 IST

हिंदी चित्रपटांप्रमाणे हरवलेली व्यक्ती नाट्यमयरित्या घरी परतली...

नारायण सावतकार, लोकमत न्युज नेटवर्क, संग्रामपूर (जि.बुलढाणा): हिंदी चित्रपटांमध्ये आपण अनेकदा पाहतो घरातून हरवलेली व्यक्ती वर्षानुवर्षांनंतर अचानक परत येते. असंच एक रील लाईफसारखं पण वास्तवात घडलेलं हृदयस्पर्शी प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील टाकळेश्वर गावात घडले. २० वर्षांपूर्वी घर सोडून गेलेले अवचितराव गुलाबराव मोरखडे हे अखेर आपल्या गावी आणि कुटुंबात पुन्हा परतले.

संग्रामपूर तालुक्यातील चोंढी टाकळेश्वर येथील अवचितराव काही वर्षांपूर्वी कुटुंबीयांसोबत गुजरातला गेले होते. मात्र, कुटुंबातील वादामुळे ते रागाच्या भरात घर सोडून निघून गेले. त्यानंतर कुणालाही त्यांच्या ठिकाणाची माहिती राहिली नाही. अनेकांनी त्यांचा मृत्यू झाल्याचेही गृहित धरले होते. अवचितराव गुजरातमधील बडोदा येथे काही मित्रांच्या साह्याने मजुरी करू लागले. पुढे परिश्रम व नियोजनाच्या जोरावर त्यांनी स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली आणि एक यशस्वी जीवन उभं केलं.

पंढरपूरच्या यात्रेने जागवली आठवण

यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवचितराव पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. तिथे घराची आणि आपल्या मुळगावाची ओढ त्यांच्या मनात पुन्हा जागी झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावाशी संपर्क साधला आणि शेवटी २० वर्षांनी टाकळेश्वर गावात परतले.

घोड्यावरून मिरवणूक, फुलांचा वर्षाव

गावात परतल्यानंतर त्यांचे फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. नातेवाइक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तर होतेच, पण चेहऱ्यावर अत्यानंद होता. एक हरवलेला माणूस पुन्हा मिळाल्याचा अनुभव गावकरी शब्दांत सांगू शकत नव्हते.

गाव गहिवरले अन्...

अवचितराव यांनी या कालावधीत आर्थिकदृष्ट्या प्रगती केली असली तरी मनातल्या एका कोपऱ्यात कुटुंबाची ओढ कायम राहिली. अखेर विठुरायाच्या चरणी नमस्कार केल्यानंतर त्यांच्या जीवनातील हरवलेली माळ पुन्हा जुळून आली. गावकऱ्यांप्रमाणेच संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा रंगली असून, ‘विठुरायाच्या कृपेने घरात पुन्हा सोनं आलं,’ असं लोक आवर्जून म्हणताना दिसत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा