शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

जामोद येथील स्वयंचलित हवामान केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 12:48 IST

Jalgaon Jamod News स्वयंचलीत हवामान केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव जामोद :  जामोद महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१९-२० चा आंबिया संत्रा बहार फळपीक विमा मिळाला नसल्याने संबंधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जामोद येथील स्वयंचलीत हवामान केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची बाब समोर आली आहे. याबाबत आमदार डॉ.संजय कुटे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता २ नोव्हेंबर पर्यंत वास्तव स्थिती सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. एकीकडे सततचा पाऊस व नापिकी यामुळे आधीच हवालदिल झालेला शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. सुनगाव येथील ५० व जामोद येथील ११ संत्रा उत्पादकांनी सन २०१९- २० चा आंबिया संत्रा बहराचा फळ पिक विमा काढला होता. हा बहार बुडाला. शेतकऱ्यांचा खर्चसुद्धा निघाला नाही.  या पृष्ठभूमीवर सोनाळा व बावनबीर महसूल मंडळातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम मिळाली. परंतु, त्याला लागून असलेल्या जामोद महसूल मंडळातील संत्रा उत्पादक मात्र वंचित राहिले. स्वयंचलित हवामान तपासण्याचे जामोद येथील केंद्र गत काही महिन्यांपासून बंद आहे. त्याचा फटका या शेतकऱ्यांना बसल्याची भिती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदweatherहवामान