शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दोन अल्पवयीन मुलींचा विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 21:16 IST

एकीचा मृत्यू: सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील घटना

साखरखेर्डा: साधारणत: १४ वर्ष वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात येत असलेल्या साखरखेर्डा पोलिस ठाण्यातंर्गत शेंदूर्जन शिवारात घडली. दरम्यान, यातील एका मुलीचा मृत्यू झाला असून एका मुलीस वाचविण्यात ग्रामस्थांंना यश आले. या दोन मुलींसमवेत आणखी एक तिसरी मुलगी होती. मात्र तिने वेळेवर आपला विचार बदल घर गाठल्याने ती सुखरूप आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

साखरखेर्डा येथील एका हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात या मुली शिक्षण घेत होत्या. दरम्यान, या तिन्ही मुली १७ डिसेंबरला शाळेतून गायब होत्या. दुपारची सुटी झाल्यानंतर त्या माध्यान्ही घरी आल्या नाहीत. त्यामुळे चलबिचल सुरू झाली होती. शाळेतील काही मुलींनी दुपारी शिक्षकांना याची कल्पना दिली. तिघीही शाळेत आल्या होत्या. परंतू वर्गात न येताच त्या इमानाच्या दिशेने गेल्या असल्याची माहिती ही देण्यात आली. त्यांच्यासोबत शाळेतीलच दोन मुलेही गायब असल्याची माहिती समोर आली होती. ही बाब पाहता शाळेतील शिक्षक त्यांच्या शोधासाठी रवाना झाले असता तिघींपैकी एक मुलगी ही घरी परतल्याचे समजले तर दोघी काळीपिवळीत बसून शेंदूर्जनच्या दिशेने गेल्याची माहिती शिक्षकांना मिळाली होती. प्रकरणी शाळेचे प्राचार्य संतोष दसरे यांनी पालकांना उपरोक्त माहिती देऊन शेंदुर्जनच्या दिशेने शिक्षक दोन्ही मुलींच्या शोधात गेले.

दरम्यान, चार वाजेच्या सुमारास दोन मुलींनी उत्तम शिंगणे यांच्या विहीरीत उडी मारल्याचे काही महिलांनी पाहिले. त्यांच्या शाळेच्या गणवेशावरून या मुली साखरखेर्डा येथील असल्याचे स्पष्ट होत होते. विहीरीत उडी घेणाऱ्या दोन्ही मुलींपैकी एकीने कसाबसा आपला जीव वाचवत विहीरीतील कपार गाठल्याने ती वाचली. ग्रामस्थांनी तिला बाहेर काढत साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे तिच्यावर डॉ. संदीप सुरुशे यांनी प्रथमोपचार करून तिला बुलडाणा येथे उपचारासाठी हलविले. दुसरीकडे शिक्षक, पोलीस, आणि ग्रामस्थांनी दुसर्या मुलीचा विहीरीत शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली. सायंकाळी सहाच्या सुमारास तिचे पार्थिव विहीरीतून बाहेर काढण्यात आले. स्नेहा गवई असे या मृत मुलीचे नाव आहे.

दरम्यान, या दोन्ही मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत ठाणेदार स्वत: तपास करीत आहेत. नवव्या वर्गातील या मुलींना आत्महत्या का करावीशी वाटली? त्यांच्यासोबत आणखी कोण होते याबाबत सध्या परिसरात चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या