सिंदखेडराजा : भारतीय स्टेट बँकांसह इतर बँकांतही पैशाचा ठणठणाट कायमअसून, ग्राहकांना फक्त दोन हजाराच्या वर पैसे मिळत नसल्याने सर्वसामान्यव्यवहार करणे कठीण झाले आहे. त्याही एटीएम सेवा बंदच असल्याने ग्राहकांनादिवसभर विड्रॉल घेवून लाईनमध्ये उभे रहावे लागत आहे.साखरखेर्डा येथे राष्ट्रीय कृत बँक एकच असल्याने या बँकेच्या अखत्यारितसाखरखेर्डा शेंदुर्जन या दोन जिल्हा परिषद सर्कलमधील ४० हून अधिक गावेयेतात. शेतकऱ्याचे चुकारे, पिक विमा रक्कम, शासकीय, निमशासकीयकर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन, व्यापारी वर्गाचाकॅशलेस व्यवहार हहा संपूर्ण भार भारतीय स्टेट बँक साखरखेर्डा शाखेवरयेवून पडला आहे. त्यात सर्व व्यवहार आॅनलाईन झाल्याने नेहमीच बंद पडणारीइंटनरनेट सेवा यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावाच लागतो. त्यातहीबँकेत पैसे नसल्याने कित्येकवेळा ग्राहकांना परत जावे लागते. केवळपैशाअभावी सर्वसामान्य ग्राहकांना व्यवहार करणे कठीण झाले आहे. १ मार्चपासून बँकेतून कितीही पैसे काढा हा दिंडोरा शासन पिटत असला तरप्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच पहायला मिळत आहे. आजारी व्यक्तीलारुग्णालयात न्यायचे म्हटले तर पाच हजार ही मिळत नाही. अशी दयनीय अवस्थाझाली आहे. बँकेतच पैसे नसल्याने एटीएममध्ये कोठून टाकावे, असा प्रश्नशाखा व्यवस्थापक कोळी यांनी उपस्थित केला. त्यातही ग्राहकांची वाढतीसंख्या लक्षात घेता कर्मचारी वाढले पण बँकेत बसण्यासाठी जागा नाही.त्यासाठी कित्येक वेळा बाहेर बसून कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.आरटीजीएस बँकेतून करायचे म्हटले तर अगोदर बँकेत कॅश भरा, त्यासाठी रांगेतउभे रहा, इतर चेक आणि फॉर्म भरुन बँकेत दया, कर्मचाऱ्यांना वेळ मिळेलतेव्हा ते आरटीजीएस करतात. काही इतर बँकेत आरटीजीएस व्यवहार म्हणजेडोकेदुखी समजल्या जाते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा कंपनीला पाचपाच दिवस कॅशलेस व्यवहार होत नाही का झाला नाही व्यवहार तर डबल फॉर्मभरुन द्या, असे उत्तर मिळते. काम सोडून या पारदर्शी व्यवहारातचव्यापाऱ्यांचा वेळ खर्ची होत आहे. या व्यवहारात सुधारणा करुन ग्राहकांना होणारात्रास थांबवावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटीएम बंदच; पैशाचा ठणठणाट
By admin | Updated: May 3, 2017 14:28 IST