शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

जबाबदारी निश्चित करून कामे मार्गी लावणार - अरविंद चावरीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 18:51 IST

रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पोलिस दलातील कमी असलेल्या मनुष्यबळाचा समतोल राखून रिझल्ट ओरिएंट कामे करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी यासाठी रेकॉर्ड वरील गुन्हेगार शोधून त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारल्यानंतर बुलडाणा पोलिस दलात नवीन काय करणार याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोणते नवीन उपक्रम राबवणार?सध्या त्या दृष्टीने अभ्यास सुरू आहे. मात्र पोलिस कॉन्स्टेबल ते अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी १०० टक्के पुर्ण करून कामे निकाली काढण्यावर आपला भर राहणार आहे. प्रथमत: कर्तव्याला प्राधान्य देवून कायदा व सुव्यस्था आबाधीत राहील यासाठी प्रयत्नरत राहणार.

संवेदनशील भागात पोलिसांची कमतरता आहे?हो. संवेदनशील म्हणून गणल्या जाणाºया खामगाव, मलकापूर, शेगाव, सह अन्य पट्ट्यात मनुष्यबळ कमी आहे. तेथे ते वाढविण्यास प्राधान्य दिले असून चार पैकी तीन दंगा काबू पथके प्रामुख्याने या भागात ठेवण्यात आले आहेत. संख्याबळ वाढविण्यासही सुरूवात केली.

दंगा काबू पथकाचे पुनर्गठन करण्यामागील उद्देश?जिल्ह्याची एकंदर स्थिती पाहता नियमानुसार चार दंगा काबू पथके असणे गरजेचे आहे. त्यातच १३२ पेक्षा अधिक पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे पाच ऐवजी चार दंगाकाबू पथके आता राहतील. संवेदनशील असलेल्या मलकापूर, खामगाव शेगाव येथे पैकी तीन तैनात केले आहेत.

पोलिस दलातील कोरोना प्रतिबंधासाठी काय करणार?पोलिस दलातही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत असून ठाणेदार व एसडीपीओ त्या भागाचे कुटुंब प्रमुख केले आहेत. दैनंदिनस्तरावर त्याचा आढावा घेत असून अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकडे लक्ष देतात.

नवीन पोलिस उपविभागाबाबत  हालचाली आहेत का?नवीन पोलिस उपविभागा स्थापन्यासंदर्भात शासनस्तरावर हालाचली आहेत. तसा प्रस्ताव गेला आहे. जळगाव जामोद, चिखली आणि अन्य एका अश्या तीन एसडीपीओ कार्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणार आहोत. मुळात २७३२ पोलिसांची जिल्ह्यास गरज असताना २६०० पोलिस आज कार्यरत आहेत. ११९  पीएसआयची गरज असताना ३३ कमी आहेत. दोन पीआय आणि दोन एसडीपीओंची पदे रिक्त आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास गुणात्मक प्राधान्य राहील.सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत रहावी या दृष्टीकोणातून नऊ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. कोवीड संसर्गाच्या संदर्भाने गणेशोस्तवाप्रमाणेच दुर्गा उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने शांतता समित्याच्या बैठकाही येत्या आठवड्यात घेणार असून नियमानुसार सर्व होईल. कमी मनुष्यबळ असल्याने दंगाकाबू पथकाचे पुनर्गठन करण्यात आले असून जिल्हा मुख्यालयी ही कर्मचारी वाढवले आहेत- अरविंद चावरिय , जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसinterviewमुलाखत