शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:37 IST

चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तब्बल सहा वर्षानंतर पावसाने बुलडाणा जिल्ह्यात जवळपास पावसाची वार्षिक सरासही गाठली असून सहा तालुक्यांमध्येही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पैनगंगेच्या उगम क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पैनगंगेला मोठा पूर आल्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून १० हजास ०१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सद्या सुरू आहे.दरम्यान, या पावसामुळे नदी काठच्या ज्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेने दिले आहेत. दरम्यान, शेलूद दिवठाणा शिवारातील शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. पैनगंगेच्या उगम क्षेत्रातीलही बºयाच भागात अशी स्थिती असून ग्रामीण भागातून येणाºया माहितीच्या आधारावर महसूल प्रशासन संभाव्य नुकसानाचे आकलन करत आहेत.दुसरीकडे २०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात पावसाने सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पावसाची नोंद होत असते. पावसाळ््याचा चौथा महिन्या संपण्यात असताना पावसाने ९९.७६ टक्के सरासरी गाठली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका (१३७.५ मिमी), मलकापूर (१२४.२३), बुलडाणा १२०.५९ (मिमी) खामगाव (१०७.२७), शेगाव (१०६.९७) आणि नांदुरा तालुक्यात १०१.२८ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. या सहा ही तालुक्यांनी पावसाची वार्षिक ससरासी ओलांडली आहे. दरम्यान, जळगाव जामोद (९९.५८), मोताळा (९८.४३), चिखली (९२.८९) आणि सिंदखेड राजातही (९०.२१) पाऊस सरासरी गाठण्याच्या असापास आला आहे. पावसाचे प्रमाण येत्या काळात असेच राहिल्यास हे चार तालुकेही वार्षिक सरासरी गाठतील असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, देऊळगाव राजा (६४.८७), लोणार तालुका ७५.३२ आणि लोणार तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८२.६५ टक्के पाऊस पडला आहे. हे तीनही तालुक्या पावसाच्या सरासरीच्या मागे आहेत. येथील परिस्थितीही काहीशी बिकट असल्याचे चित्र आहे.चार मंडळात अतिवृष्टीसकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यातील कवठल (८४.५मिमी), मेहकर (६९.७), मलकापूर (९०.७) आणि वझर मंडळामध्ये ८८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या मंडळामध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे २५ सप्टेंबर रोजी रात्री पडलेला पाऊस हा मुसळधार होता. त्यामुळे अल्पकालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला व नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले.नुकसानाचा सर्व्हे करण्यो निर्देश४या पावसामुळे जिल्ह्यातील बºयाच भागात शेतीचे नुकसान झाले आहे. काहींची शेत जमीन खरडून गेली तर नदी काठच्या भागातील शेतकºयांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पृष्ठभूमीवर महूल विभागाने हे निर्देश दिले आहेत. खामगाव तालुक्यालगतच्या ज्ञानगंगा धरणालगत दिवठाणा परिसरातील काही घरांना पाण लागल्याने तेथील परिस्थिती पाहता येथील काही नागरिकांना तातडीने रात्री अन्यत्र हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस