शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

बुलडाणा जिल्ह्यात पावसाने गाठली वार्षिक सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 15:37 IST

चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तब्बल सहा वर्षानंतर पावसाने बुलडाणा जिल्ह्यात जवळपास पावसाची वार्षिक सरासही गाठली असून सहा तालुक्यांमध्येही पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून बुलडाणा, चिखली तालुक्यातस जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे पैनगंगेच्या उगम क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पैनगंगेला मोठा पूर आल्यामुळे पेनटाकळी प्रकल्पाच्या नऊ दरवाज्यातून १० हजास ०१५ क्युसेस पाण्याचा विसर्ग सद्या सुरू आहे.दरम्यान, या पावसामुळे नदी काठच्या ज्या शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल यंत्रणेने दिले आहेत. दरम्यान, शेलूद दिवठाणा शिवारातील शेती खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. पैनगंगेच्या उगम क्षेत्रातीलही बºयाच भागात अशी स्थिती असून ग्रामीण भागातून येणाºया माहितीच्या आधारावर महसूल प्रशासन संभाव्य नुकसानाचे आकलन करत आहेत.दुसरीकडे २०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १३८ टक्के पाऊस झाला होता. त्यानंतर प्रथमच बुलडाणा जिल्ह्यात पावसाने सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर वार्षिक सरासरी ओलांडली आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पावसाची नोंद होत असते. पावसाळ््याचा चौथा महिन्या संपण्यात असताना पावसाने ९९.७६ टक्के सरासरी गाठली आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका (१३७.५ मिमी), मलकापूर (१२४.२३), बुलडाणा १२०.५९ (मिमी) खामगाव (१०७.२७), शेगाव (१०६.९७) आणि नांदुरा तालुक्यात १०१.२८ मिमी पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. या सहा ही तालुक्यांनी पावसाची वार्षिक ससरासी ओलांडली आहे. दरम्यान, जळगाव जामोद (९९.५८), मोताळा (९८.४३), चिखली (९२.८९) आणि सिंदखेड राजातही (९०.२१) पाऊस सरासरी गाठण्याच्या असापास आला आहे. पावसाचे प्रमाण येत्या काळात असेच राहिल्यास हे चार तालुकेही वार्षिक सरासरी गाठतील असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, देऊळगाव राजा (६४.८७), लोणार तालुका ७५.३२ आणि लोणार तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८२.६५ टक्के पाऊस पडला आहे. हे तीनही तालुक्या पावसाच्या सरासरीच्या मागे आहेत. येथील परिस्थितीही काहीशी बिकट असल्याचे चित्र आहे.चार मंडळात अतिवृष्टीसकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यातील कवठल (८४.५मिमी), मेहकर (६९.७), मलकापूर (९०.७) आणि वझर मंडळामध्ये ८८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या मंडळामध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे २५ सप्टेंबर रोजी रात्री पडलेला पाऊस हा मुसळधार होता. त्यामुळे अल्पकालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला व नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले.नुकसानाचा सर्व्हे करण्यो निर्देश४या पावसामुळे जिल्ह्यातील बºयाच भागात शेतीचे नुकसान झाले आहे. काहींची शेत जमीन खरडून गेली तर नदी काठच्या भागातील शेतकºयांच्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पृष्ठभूमीवर महूल विभागाने हे निर्देश दिले आहेत. खामगाव तालुक्यालगतच्या ज्ञानगंगा धरणालगत दिवठाणा परिसरातील काही घरांना पाण लागल्याने तेथील परिस्थिती पाहता येथील काही नागरिकांना तातडीने रात्री अन्यत्र हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस