शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:34 IST

बुलडाणा : काळजातून जेव्हा शब्द कागदावर उमटतात, तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्या अर्थाने समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून ...

बुलडाणा : काळजातून जेव्हा शब्द कागदावर उमटतात, तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्या अर्थाने समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून लिहिल्यामुळे अण्णा भाऊ साठे यांची साहित्यनिर्मिती ‘अस्सल’ ठरली अन् ते खऱ्या अर्थाने ‘साहित्यरत्न’ ठरले, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र काळे यांनी करून, काळाच्या ओघात अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य, की जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा शोध घेऊन त्या साहित्याच्या प्रकाशनासाठी विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात अण्णा भाऊ साठे सोशल फोरमने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीदरम्यान म्हणजेच २० जुलै ते १ ऑगस्टदरम्यान अण्णा भाऊंच्या नावाने आयोजित व्याख्यानमालेचे नववे पुष्प सोमवारी (दि. २६) सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने ‘अण्णा भाऊ साठे सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य’ या फेसबुक पेजवरून पत्रकार राजेंद्र काळे यांनी गुंफले. ‘अण्णा भाऊंचे प्रगल्भ साहित्यविश्व’ या विषयाची मांडणी करताना त्यांनी अण्णा भाऊंच्या अप्रकाशित साहित्याच्या प्रकाशनाच्या दृष्टीने शोध घेण्याचे आवाहन करताना, हे साहित्य भविष्याचा वेध घेऊ शकते, अशा भावनाही त्यांनी मांडल्या. फोरमच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेची माहिती आरंभी आयोजक अ‍ॅड. डिगांबर अंभोरे यांनी देऊन, विजय अंभोरे यांच्या प्रेरणेतून समाजहिताच्या दृष्टीने स्थापन झालेल्या फोरमचे उद्दिष्टही विशद केले.

अण्णा भाऊंचे प्रगल्भ साहित्यविश्व

यात ३५ कादंबऱ्या, त्यात १९५९ मध्ये लिहिलेली ‘फकिरा’ की जिला १९६९ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. १५ लघुकथांचा संग्रह, ज्यात मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये व २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या. ‘रशियातील भ्रमंती’ हे प्रवासवर्णन, १२ चित्रपटांच्या पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी एवढं अफाट अन् तेवढंच अचाट साहित्यविश्व अण्णा भाऊंनी त्यांच्या लेखणीतून साकारलं. अण्णा भाऊंच्या साहित्याचा अन् त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारी तब्बल १३ पुस्तके आतापर्यंत अन्य साहित्यिकांची प्रकाशित झाली असल्याची माहिती यावेळी पत्रकार राजेंद्र काळे यांनी दिली.