शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

उभ्या पिकात घुसवली जनावरे! उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:49 IST

पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

- अनिल गवईबुलडाणा  - पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असतानाच, शेतमालाच्या भावात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घसरण होत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच काही पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर कडाडले असतानाच, वांग्याचे दर झपाट्याने कोसळले आहेत. वांग्यासोबतच भेंडी आणि टरबूजाच्या भावात घसरण आहे. शिवाय पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हाच्या झळांमुळे ‘मल्चिंग पेपर’वरची टरबूज शेती उन्हामुळे धोक्यात आली आहे. मोठ्याप्रमाणात उत्पादन खर्च केल्यानंतरही अपेक्षीत उत्पादन होत नसल्याने, शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून, भाजीपाला बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्याऐवजी काही शेतकरी या पिकांचा जनावरांच्या चाºयासाठी उपयोग करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.

शेतमाल बाजारपेठेत नेण्याचाच खर्च अधिक!

गेल्या काही दिवसांपासून बाजारात वांग्याचे दर कमालिचे घसरले आहेत. किरकोळ बाजारपेठेत वांगी ८ ते १० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत. घाऊक बाजारपेठेत त्यापेक्षाही कमी दर किलोमागे मिळत आहे. मिळणाºया भावापेक्षा खर्च अधिक असल्याने खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करीत आहेत.उत्पादन खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे पिकविलेले उत्पादन बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नाही. नाईलाज म्हणून वांगी आणि इतर पिकांचा जनावरांना चारा म्हणून वापर करीत आहे.

- वासुदेव गव्हाळे, शेतकरी, ता. खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी