शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकात घुसवली जनावरे! उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 13:49 IST

पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

- अनिल गवईबुलडाणा  - पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असतानाच, शेतमालाच्या भावात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घसरण होत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच काही पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर कडाडले असतानाच, वांग्याचे दर झपाट्याने कोसळले आहेत. वांग्यासोबतच भेंडी आणि टरबूजाच्या भावात घसरण आहे. शिवाय पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हाच्या झळांमुळे ‘मल्चिंग पेपर’वरची टरबूज शेती उन्हामुळे धोक्यात आली आहे. मोठ्याप्रमाणात उत्पादन खर्च केल्यानंतरही अपेक्षीत उत्पादन होत नसल्याने, शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून, भाजीपाला बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्याऐवजी काही शेतकरी या पिकांचा जनावरांच्या चाºयासाठी उपयोग करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.

शेतमाल बाजारपेठेत नेण्याचाच खर्च अधिक!

गेल्या काही दिवसांपासून बाजारात वांग्याचे दर कमालिचे घसरले आहेत. किरकोळ बाजारपेठेत वांगी ८ ते १० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत. घाऊक बाजारपेठेत त्यापेक्षाही कमी दर किलोमागे मिळत आहे. मिळणाºया भावापेक्षा खर्च अधिक असल्याने खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करीत आहेत.उत्पादन खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे पिकविलेले उत्पादन बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नाही. नाईलाज म्हणून वांगी आणि इतर पिकांचा जनावरांना चारा म्हणून वापर करीत आहे.

- वासुदेव गव्हाळे, शेतकरी, ता. खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी