शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 13:55 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने जिल्हाभरात सुमारे ४१७ कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. परंतू नुकसानावर जाहीर केलेल्या मदतीबाबत जिल्हाभर खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींसह पक्ष, विविध संघटना, शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत. मदत वाढवून देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातून राज्यपालांपर्यंत निवेदने दिली जात आहेत. परंतू मदतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यासह भाजीपालावर्गीय पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. या दोन्ही महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. या नुकसानानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. पुढे हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल, या शेतकºयांच्या नजरा लागल्या होता. दरम्यान, शनिवारी नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. राज्यपालांनी घोषीत केलेल्या या मदतीवर जिल्हाभरातून वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. मदतीत वाढ हवी, यासाठी शेतकºयांसोबतच विविध पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. राज्यपालांपर्यंत निवेदने पाठविण्यात येत आहेत. जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपूंजी असल्याने या मदतीमध्ये वाढ करण्याबाबत जिल्हाभरातून मागणी होत आहे.संघटना आक्रमक पावित्र्यातअतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतीला लागलेला खर्च भरून निघणारी सुद्धा नाही. त्यामुळे या मदतीमध्ये ताताडीने वाढ करण्यात यावी, यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकºयांसह विविध संघटनाही आक्रमक पावित्र्यात आहेत. यासंदर्भात राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट राज्यपालांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषद, शेतकरी संवेदना परिषद व विविध लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्वाधिक नुकसान मेहकर तालुक्यात जिल्ह्यात एकूण नुकसान ६ लाख ९० हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर झालेले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे मेहकर तालुक्यातील आहे. मेहकर तालुक्यात मेहकर ८२ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील ५७ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात ८० हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावरील ५५ कोटी ७२ लाख एक हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी