शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 13:55 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: परतीच्या पावसाने जिल्हाभरात सुमारे ४१७ कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. परंतू नुकसानावर जाहीर केलेल्या मदतीबाबत जिल्हाभर खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींसह पक्ष, विविध संघटना, शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत. मदत वाढवून देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातून राज्यपालांपर्यंत निवेदने दिली जात आहेत. परंतू मदतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हाक राज्यपालांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्यात परतीच्या व अवकाळी पावसाने सहा लाख ९० हजार ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी यासह भाजीपालावर्गीय पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात वार्षिक सरासरीच्या २२.१९ टक्के पाऊस पडला होता. या दोन्ही महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाची साधारणस्थिती पाहता त्यातुलनेत हा पाऊस तब्बल २१८ टक्के पडला होता. या नुकसानानंतर कृषी व महसूल विभागाने तातडीने नुकसानाचे पंचनामे करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. पुढे हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष शेतकºयांच्या हातात नुकसान भरपाई पडेल, या शेतकºयांच्या नजरा लागल्या होता. दरम्यान, शनिवारी नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली. राज्यपालांनी घोषीत केलेल्या या मदतीवर जिल्हाभरातून वेगवेळ्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसून येत आहे. मदतीत वाढ हवी, यासाठी शेतकºयांसोबतच विविध पक्ष, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. राज्यपालांपर्यंत निवेदने पाठविण्यात येत आहेत. जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपूंजी असल्याने या मदतीमध्ये वाढ करण्याबाबत जिल्हाभरातून मागणी होत आहे.संघटना आक्रमक पावित्र्यातअतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत शेतीला लागलेला खर्च भरून निघणारी सुद्धा नाही. त्यामुळे या मदतीमध्ये ताताडीने वाढ करण्यात यावी, यासाठी लोकप्रतिनिधी व शेतकºयांसह विविध संघटनाही आक्रमक पावित्र्यात आहेत. यासंदर्भात राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट राज्यपालांच्या भूमिकेवरच ताशेरे ओढले आहेत. जिल्ह्यातील अखिल भारतीय सरपंच परिषद, शेतकरी संवेदना परिषद व विविध लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सर्वाधिक नुकसान मेहकर तालुक्यात जिल्ह्यात एकूण नुकसान ६ लाख ९० हजार ६०३ हेक्टर क्षेत्रावर झालेले आहे. त्यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे मेहकर तालुक्यातील आहे. मेहकर तालुक्यात मेहकर ८२ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील ५७ कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. त्यापाठोपाठ चिखली तालुक्यात ८० हजार ३८६ हेक्टर क्षेत्रावरील ५५ कोटी ७२ लाख एक हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी