शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जिल्हा परिषद सोबतच आता ग्रामपंचायतच्या आरक्षणावरही बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:00 IST

Gram Panchayat reservation ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाची टक्केवारी अधिक होत असल्याचा मुद्दा जोडण्यात आला.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये दिल्या जाणारे सामाजिक आरक्षण ५० टक्क्यापेक्षा अधिक होत असल्याने घटनेतील तरतुदीतच ते द्यावे, या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच आता त्यामध्ये ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाची टक्केवारी अधिक होत असल्याचा मुद्दा जोडण्यात आला. त्यावर आता १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होत आहे. राज्यातील अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार व नागपूर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा अध्यादेश ३१ जुलै २०१८ रोजी काढला होता. त्या अध्यादेशामुळेही आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. त्यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत आयोगाला दोन महिन्यांत लोकसंख्येची माहिती दिली जाईल, असे नमूद केले.  प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) मिळून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा निश्चित होतील. त्याबाबत सामाजिक, आर्थिक सर्व्हे २०११ नुसार माहिती उपलब्ध आहे, असे शासनाने आधीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.त्यानंतरच्या सुनावणीत शासनाने अध्यादेश मागे घेत प्रचलित पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार निवडणुकही झाली. आरक्षणाच्या मुद्यावर दाखल याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यात आता ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदासाठी आरक्षित जागांची संख्याही अधिक होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्ते वाशिम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांनी जोडला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या एकुण जागांपैकी आरक्षित जागा ५० टक्क्यापर्यंत मर्यादित होण्याची शक्यता आहे. 

भंडारा जिल्ह्यातील आरक्षणाचा मुद्दा  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना भंडारा जिल्हा परिषदेत आरक्षित जागांची संख्या एकने अधिक आहे.  आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये ते प्रमाण १.९२ टक्के असल्याचे नमूद केले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या ५४१ पैकी २८० जागा राखीव आहेत.  आरक्षणानुसार निर्धारित होणाऱ्या  ९ जागा अधिक तर टक्केवारीनुसार १.७५ टक्के अधिक होत आहेत. ही माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतreservationआरक्षणkhamgaonखामगाव