शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सोबतच आता ग्रामपंचायतच्या आरक्षणावरही बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:00 IST

Gram Panchayat reservation ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाची टक्केवारी अधिक होत असल्याचा मुद्दा जोडण्यात आला.

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये दिल्या जाणारे सामाजिक आरक्षण ५० टक्क्यापेक्षा अधिक होत असल्याने घटनेतील तरतुदीतच ते द्यावे, या मागणीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच आता त्यामध्ये ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदाच्या आरक्षणाची टक्केवारी अधिक होत असल्याचा मुद्दा जोडण्यात आला. त्यावर आता १७ फेब्रुवारी रोजी सुनावणी होत आहे. राज्यातील अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार व नागपूर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचा अध्यादेश ३१ जुलै २०१८ रोजी काढला होता. त्या अध्यादेशामुळेही आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाली. त्यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत आयोगाला दोन महिन्यांत लोकसंख्येची माहिती दिली जाईल, असे नमूद केले.  प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रातील इतर मागासवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी) मिळून नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जागा निश्चित होतील. त्याबाबत सामाजिक, आर्थिक सर्व्हे २०११ नुसार माहिती उपलब्ध आहे, असे शासनाने आधीच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.त्यानंतरच्या सुनावणीत शासनाने अध्यादेश मागे घेत प्रचलित पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानुसार निवडणुकही झाली. आरक्षणाच्या मुद्यावर दाखल याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यात आता ग्रामपंचायतींचे सदस्य व सरपंच पदासाठी आरक्षित जागांची संख्याही अधिक होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्ते वाशिम जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विकास गवळी यांनी जोडला आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदाच्या एकुण जागांपैकी आरक्षित जागा ५० टक्क्यापर्यंत मर्यादित होण्याची शक्यता आहे. 

भंडारा जिल्ह्यातील आरक्षणाचा मुद्दा  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना भंडारा जिल्हा परिषदेत आरक्षित जागांची संख्या एकने अधिक आहे.  आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये ते प्रमाण १.९२ टक्के असल्याचे नमूद केले आहे. तर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या ५४१ पैकी २८० जागा राखीव आहेत.  आरक्षणानुसार निर्धारित होणाऱ्या  ९ जागा अधिक तर टक्केवारीनुसार १.७५ टक्के अधिक होत आहेत. ही माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतreservationआरक्षणkhamgaonखामगाव