शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 14:00 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पीक कर्ज वाटपाचा टक्का सुधारण्याच्या दृष्टीने जिल्हा अग्रणी बँकेने पावले टाकली असून १२ दिवसात दहा टक्क्यांनी पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१९ ही खरीपाचे पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत आहे. त्यामुळे येत्या दीड महिन्यात पीक कर्ज वाटपाची मोठी कसरत जिल्हा अग्रणी बँकेला करावी लागणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकऱ्यांना यावर्षी एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. त्यापैकी एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी पीक कर्जासाठी सध्या पात्र आहेत. जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा हा प्रामुख्याने कृषी क्षेत्रामध्ये अधिक तरतूद करणार आहे. औद्योगिक दृष्ट्या जिल्हा डी प्लसमध्ये असल्याने प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर जिल्हयाची मदार आहे. त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची दोलायमान आर्थिक स्थिती पाहता जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, व्यापारी तथा सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांवरच २०१३ पासून कृषी क्षेत्रामध्ये पीक कर्ज वाटपाची मदार येऊन ठेपली आहे. नाही म्हणायला जिल्हयात पतसंस्थांचे मोठे जाळे असून जिल्हयाच्या अर्थकारणात या पतसंस्थांचा जवळपास ७१ टक्के वाटा आहे तर राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांचा वाटा हा २९ टक्क्यांच्या आसापास आहे.त्यातच जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची एकंदरीत स्थिती काहीशी बिकट असल्याने प्रामुख्याने मोठ्या बँकांवरच पीक कर्जासाठी शेतकºयांची मदार आहे.ही बाब पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आतापर्यंत जिल्ह्यातील २४ हजार ३४९ शेतकºयांना तब्बल १७९ कोटी ५२ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. वास्तविक जिल्हयातील पीक कर्जाची गरज असलेल्या शेतकºयांचा विचार करता या क्षेत्रातील बँकांना दोन लाख ६६ हजार ५२७ शेतकºयांना पीक कर्ज देण्याचे उदिष्ट आहे. पैकी प्रत्यक्षात पीक कर्जासाठी ६५ हजार १२५ शेतकरी पात्र ठरलेले असून त्यापैकी ३७ टक्के शेतकºयांना सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांनी पीक कर्ज दिले आहे. दरम्यान, अद्यापही पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यापारी बँकांचे ४७ कोटी वाटपपात्र शेतकºयांपैकी दोन हजार ७८१ शेतकºयांना व्यापारी बँकांनी ४६ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण शेतकºयांपैकी या बँकांना २६ हजार ७६६ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. दरम्यान, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने चार हजार ३९४ शेतकºयांना ३६ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असून त्याची टक्केवारी ही १३ टक्के जाते.

जिल्हा बँकेचे वाटप ५६ टक्के४जिल्हा बँकेने पाच हजार १९५ शेतकºयांना २६ कोटी ५७ लाख ४१ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी ही ५६ टक्के जाते. या बँकेला नऊ हजार ४५० शेतकºयांना ४७ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. आर्थिक दृष्ट्या फारशी सक्षम नसलेल्या या बँकेने आतापर्यंत पीक कर्ज वाटपाचा टक्का बºयाबैकी वाढता ठरवीला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी