शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:27 IST

जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी राज्यातील बाजार समितींच्या कर्मचाऱ्यांनी ५ आॅगस्टपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील १३ बाजार समितींसह उपबाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला. बुलडाणा, खामगाव, मलकापूर, चिखली या मुख्य बाजार समितींसह इतर बाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले असून शेतकºयांना याचा फटका बसत आहे.मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर काही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६ हजार ८७७ कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बाजार समिती कर्मचारी संघटनेने हा लढा पुकारला आहे. जिल्ह्यातील अडीचशेच्या वर कर्मचाºयांचा संपात सहभाग आहे. शासनाने भाजीपाला नियमन मुक्ती, मार्केट यार्डच्या बाहेरील धान्य नियमन मुक्तीचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचा सेस बंद करुन सेवाशुल्क आकारणी भरण्याबाबत निर्णय घेण्याचा शासन विचार करीत आहे. त्यामुळे बाजार समित्या बंद पडतील. काही बाजार समिती कर्मचाºयांचे १० ते २० महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तेलंगणा व तामिळनाडू राज्यातील बाजार समित्यांच्या कर्मचाºयांप्रमाणे राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाºयांची मुख्य मागणी आहे.बुलडाणा येथील बाजार समितीचे कामकाज सकाळपासून बंद ठेवण्यात आले. बाजार समिती सचिव वनिता साबळे, दिगंबर दांदडे, बबन निकम, जितेंद्र गवई, दीपक चव्हाण, सुनील काळवाघे, शशांक जेऊघाले, वर्षा भोंडे यांच्यासह इतर कर्मचारी संपात सहभागी झाले. हमाल मापारी संघाचा पाठींबाशासकिय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचाºयांनी सोमवारपासून संप पुकारला. जिल्ह्यातील १३ बाजार समिती व उपबाजार समितीत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. हमाल मापारी कामगार सेनेने संपाला पाठींबा जाहीर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे जिल्हा प्रतिनिधी विलास पुंडकर यांनी दिली.

वरवट बकाल येथील उपबाजारातील धान्य लिलाव बंदवरवट बकाल : बाजार समिती कर्मचºयांना राज्य शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ५ आॅगस्टला संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांनी कार्यालयीन कामकाज बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी कार्यालयाच्या मुख्यालयासमोर ठाण मांडून शासनसेवेत समाविष्ट करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, सोमवारला वरवट बकाल उपबाजारातील धान्य लिलावसुद्धा बंद होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarket Yardमार्केट यार्डStrikeसंप