शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कृषी महोत्सवाची चुकली वेळ; शेतकरी सोयाबीन हंगामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:41 IST

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून येते. शेतकºयांसाठी कृषी प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत लाभदायी ठरतो. उत्पादनात वाढ, पिकांवर येणाºया रोग व किटकांना कशा प्रकारे नष्ट करायचे, नवनविन शेतीची उपकरणे, नविन वाण, कमी कालावधीत अधीक उत्पादन यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकºयांना कृषी प्रदर्शनात सहज मिळतात. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा कृषी महोत्सव म्हटला की त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र त्यासाठी कृषी महोत्सवाची वेळही शेतकºयांना हजर राहता येईल, असा असणे आवश्यक आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषी महोत्सव २०१८’ ची सुरूवात ४ आॅक्टोबरपासून झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान सप्ताहांतर्गत ४, ५ व ६ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणारा हा कृषी महोत्सव शेतकºयांच्या एैन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शेतकरी सोयाबीन हे नगदी पीक घेतात.  शेतकºयांचे वर्षभरातील अर्थचक्र सोयाबीन या पीकावर अवलंबुन असते. त्यामुळे सोयाबीन सोंगणीच्या हंगामात शेतकरी कुठेच जाऊ शकत नाहीत. सध्या सोयाबीन कपाणीला आली असून जिल्हाभरातील शेतकरी सोयाबीन कापणीच्या या हंगामात व्यस्त आहेत; अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या कृषी महोत्सवात शेतकरी हजर राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये शुकशुकाटा पहावयास मिळतो. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  

कृषी तज्ज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसरशेतकºयांच्या कामाच्या दिवसातच महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने कृषी तज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनाही कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ साधता आली नसल्याने महोत्सवामध्ये शेतकºयांची उपस्थिती जाणवत नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी