शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कृषी महोत्सवाची चुकली वेळ; शेतकरी सोयाबीन हंगामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:41 IST

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून येते. शेतकºयांसाठी कृषी प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत लाभदायी ठरतो. उत्पादनात वाढ, पिकांवर येणाºया रोग व किटकांना कशा प्रकारे नष्ट करायचे, नवनविन शेतीची उपकरणे, नविन वाण, कमी कालावधीत अधीक उत्पादन यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकºयांना कृषी प्रदर्शनात सहज मिळतात. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा कृषी महोत्सव म्हटला की त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र त्यासाठी कृषी महोत्सवाची वेळही शेतकºयांना हजर राहता येईल, असा असणे आवश्यक आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषी महोत्सव २०१८’ ची सुरूवात ४ आॅक्टोबरपासून झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान सप्ताहांतर्गत ४, ५ व ६ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणारा हा कृषी महोत्सव शेतकºयांच्या एैन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शेतकरी सोयाबीन हे नगदी पीक घेतात.  शेतकºयांचे वर्षभरातील अर्थचक्र सोयाबीन या पीकावर अवलंबुन असते. त्यामुळे सोयाबीन सोंगणीच्या हंगामात शेतकरी कुठेच जाऊ शकत नाहीत. सध्या सोयाबीन कपाणीला आली असून जिल्हाभरातील शेतकरी सोयाबीन कापणीच्या या हंगामात व्यस्त आहेत; अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या कृषी महोत्सवात शेतकरी हजर राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये शुकशुकाटा पहावयास मिळतो. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  

कृषी तज्ज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसरशेतकºयांच्या कामाच्या दिवसातच महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने कृषी तज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनाही कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ साधता आली नसल्याने महोत्सवामध्ये शेतकºयांची उपस्थिती जाणवत नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी