शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

कृषी महोत्सवाची चुकली वेळ; शेतकरी सोयाबीन हंगामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:41 IST

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून येते. शेतकºयांसाठी कृषी प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत लाभदायी ठरतो. उत्पादनात वाढ, पिकांवर येणाºया रोग व किटकांना कशा प्रकारे नष्ट करायचे, नवनविन शेतीची उपकरणे, नविन वाण, कमी कालावधीत अधीक उत्पादन यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकºयांना कृषी प्रदर्शनात सहज मिळतात. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा कृषी महोत्सव म्हटला की त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र त्यासाठी कृषी महोत्सवाची वेळही शेतकºयांना हजर राहता येईल, असा असणे आवश्यक आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषी महोत्सव २०१८’ ची सुरूवात ४ आॅक्टोबरपासून झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान सप्ताहांतर्गत ४, ५ व ६ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणारा हा कृषी महोत्सव शेतकºयांच्या एैन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शेतकरी सोयाबीन हे नगदी पीक घेतात.  शेतकºयांचे वर्षभरातील अर्थचक्र सोयाबीन या पीकावर अवलंबुन असते. त्यामुळे सोयाबीन सोंगणीच्या हंगामात शेतकरी कुठेच जाऊ शकत नाहीत. सध्या सोयाबीन कपाणीला आली असून जिल्हाभरातील शेतकरी सोयाबीन कापणीच्या या हंगामात व्यस्त आहेत; अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या कृषी महोत्सवात शेतकरी हजर राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये शुकशुकाटा पहावयास मिळतो. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  

कृषी तज्ज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसरशेतकºयांच्या कामाच्या दिवसातच महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने कृषी तज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनाही कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ साधता आली नसल्याने महोत्सवामध्ये शेतकºयांची उपस्थिती जाणवत नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी