शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
4
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
5
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
6
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
7
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
8
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
9
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
10
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
11
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
12
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
13
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
14
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
15
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
16
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
17
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
18
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
19
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
20
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
Daily Top 2Weekly Top 5

अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको- चौधरी

By निलेश जोशी | Updated: October 26, 2023 19:29 IST

देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाला आहे.

बुलढाणा : अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. आता अग्निवीर वीरगतीला प्राप्त होत असल्याने या योजनेतील कच्चे दुवे स्पष्ट होत आहे. सोहतच भारतीय सैन्यदलात यामुळे उभी फूट पडू शकते, अशी टीका काँग्रेसच्या माजी सैनिक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल रोहित चौधरी यांनी २६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथे केले.

देशातील दुसरा व महाराष्ट्रातील पहिला अग्निवीर अक्षय गवते सियाचीनमध्ये वीरगतीला प्राप्त झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी ते २६ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव सराई येथे आले होते. त्यानंतर बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेऊन योजनेतील फोलपणा, कच्चे दुवे व देश सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेच्या माध्यमातून केंद्रातील सरकारवर टीका करताना भारतीय सैन्यात नियमित सैनिक व अल्पकाळ सेवा करणारे अग्निवीर अशी फूट पाडल्या गेली आहे.

काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी हा धोका आधीच अेाळखत या योजनेला प्रखर विरोध केला आहे. दरम्यान नियमित सैनिक व अग्निवीर यांना मिळणारे वेतन, आर्थिक लाभ, सेवा काळ, यात मोठी तफावत आहे. अग्निवीराला पेन्शन, कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा नाहीत. तारुण्यातच ते निवृत्त होतील. त्यातच माजी सैनिकांचा दर्जा नसल्याने सैन्याकडून मिळणारे अनेक लाभही त्यांना मिळणार नाहीत. शहीद अग्निवीर अक्षय गवतेंमुळे आता अनेक बाबी समोर येत असल्याचे चौधरी म्हणाले.

दरम्यान सैनिकाला दीर्घ प्रशिक्षण गरजेचे आहे. ऑल वेदरमध्ये कार्यरत राहण्यासाठी सैनिकाला किमान सहा वर्षे लागतात. येथे अवघ्या सहा महिन्यांत अग्निवीराला संवेदनशील ठिकाणी तैनात केल्या जात आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, असे ते म्हणाले. पंजाबमधील शहीद अग्निवीराला मानवंदना सारखा सन्मानसुद्धा मिळाला नाही. यामुळे येत्या पाच वर्षांत भारताची सैनिक संख्या घटून दहा लाखांच्या आसपास येईल. त्यातही अग्निवीरांची संख्या अधिक असेल असे ते म्हणाले. त्यामुळे ही योजना बंद करण्याची मागणीच त्यांनी केली.---

अग्निवीर अक्षय गवतेच्या कुटंबाला एक कोटी रुपये द्यावेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहीद अक्षय गवतेच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत जाहीर करणे ही लज्जास्पद बाब आहे, अशी प्रतिक्रिया चौधरींनी दिली. सोबतच ही योजना कायम ठेवायची असेल तर नियमित सैनिक व अग्निवीर यामधील भेद दूर करून ते समान पातळीवर आणावेत. केंद्र व राज्याचेही सैनिकाप्रती दायित्व आहे. शहिदाला १ कोटीची मदत, घरातील एकाला शासकीय नोकरी, १० एकर शेती देण्याची मागणी चौधरी यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, समन्वयक संदेश सिंगलकर, आ. धीरज लिंगाडे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, विजय अंभोरे उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेस