शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:31 IST

सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

बुलडाणा : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून संजय ताकतोडे यांनी बीड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. या घटनेस भाजप सरकार जबाबदार असून या सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून अ, ब, क, ड च्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने विविध आंदोलने केली. परंतू अद्यापही शासनाने समाजाला न्याय दिला नाही. यामुळे नैराश्यापोटी संजय ताकतोडे यांनी बिड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. ही घटना समाजासाठी अत्यंत दुदैवी असून माणूसकिला काळिमा फासणारी आहे. या घटनेला भाजप शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे सांगत मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी क्रांतीविर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी सदस्य विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात चिखली- बुलडाणा मार्गावर काही वेळ ठिय्या मांडला. संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्ट व कलम ३०२ प्रमाणे गुन्हे दाखल करा, संजय ताकतोडे यांच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची मदत द्या, त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकिय नोकरीत सामावून घ्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकºयांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात श्रीकृष्ण शिंदे, निवृत्ती तांबे, गजानन पवार, नारायण जाधव, एस. टी. सोनुने, पी. डी. महाले, ओमप्रकाश नाटेकर, भगवान गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, लता निकाळजे, हिंमतराव यंगड, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, अनिल कांबळे, आकाश जाधव, पुंडलिक बावस्कर, मधुकर महाले, शंकर अवसरमोल, अंजली खुपराव, विजय पारेकर, सोनु सुरडकर, सुभाष निकाळजे, एच. ए. मानवतकर, डॉ. बी. आर. दाभाडे, संजय गायकवाड, अनिल भालेराव, संजय नामदेव गायकवाड सहभागी झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय