शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सकल मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:31 IST

सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

बुलडाणा : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत नसल्यामुळे आलेल्या नैराश्यातून संजय ताकतोडे यांनी बीड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. या घटनेस भाजप सरकार जबाबदार असून या सरकारचा निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून अ, ब, क, ड च्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी मातंग समाजाने विविध आंदोलने केली. परंतू अद्यापही शासनाने समाजाला न्याय दिला नाही. यामुळे नैराश्यापोटी संजय ताकतोडे यांनी बिड येथील बिंदूसरा धरणात जलसमाधी घेतली. ही घटना समाजासाठी अत्यंत दुदैवी असून माणूसकिला काळिमा फासणारी आहे. या घटनेला भाजप शासनाचे धोरण जबाबदार असल्याचे सांगत मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकºयांनी क्रांतीविर लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे माजी सदस्य विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात चिखली- बुलडाणा मार्गावर काही वेळ ठिय्या मांडला. संजय ताकतोडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्ट व कलम ३०२ प्रमाणे गुन्हे दाखल करा, संजय ताकतोडे यांच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची मदत द्या, त्यांच्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकिय नोकरीत सामावून घ्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चेकºयांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात श्रीकृष्ण शिंदे, निवृत्ती तांबे, गजानन पवार, नारायण जाधव, एस. टी. सोनुने, पी. डी. महाले, ओमप्रकाश नाटेकर, भगवान गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, लता निकाळजे, हिंमतराव यंगड, राजू नाटेकर, समाधान निकाळजे, अनिल कांबळे, आकाश जाधव, पुंडलिक बावस्कर, मधुकर महाले, शंकर अवसरमोल, अंजली खुपराव, विजय पारेकर, सोनु सुरडकर, सुभाष निकाळजे, एच. ए. मानवतकर, डॉ. बी. आर. दाभाडे, संजय गायकवाड, अनिल भालेराव, संजय नामदेव गायकवाड सहभागी झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय