शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दुध आंदोलनानंतर आता कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन - रविकांत तूपकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 17:52 IST

बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे दिली.

ठळक मुद्दे पत्रकार परिषदेत त्यांनी कापूस, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लढा येत्या काळात लढणार असल्याचे संकेतच दिले. शेतकऱ्यांना बांधून मिळणार असून भाव न देणाऱ्या दुध संघाला सबसीडी दिली जाऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

बुलडाणा : दुध दरवाढीसंदभार्तील आंदोलनाचे यश पाहता येत्या काळत विदर्भ, मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  संघटीत करून जिल्हानिहाय परिषदा घेण्यात येणार असल्याची माहिती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे दिली. स्थानिक विश्रामगृहामध्ये रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कापूस, आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लढा येत्या काळात लढणार असल्याचे संकेतच दिले. यावेळी स्वाभीमानीचे राणा चंद्रशेखर चंदन, शेख रफीक, प्रदीप शेळके, खंडूबा मोरे, नितीन जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यात दुध उत्पादकांचा प्रश्न गंभीर बनत होता. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असतानाच दुध उत्पादक शेतकरीही आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर आला होता. त्या पृष्ठभूमीवर केंद्र, राज्य सरकारमधील मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. पुण्यात मोर्चा काढण्यात आला पण राज्य शासनाने ही बाब गंभीरतेने न घेतल्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागली. त्या उपरही पोलिस बळाचा वापर व कार्यकर्र्त्यांची धरपकड यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे तुपकर पुढे बोलतांना मिळाले. दुधाचा भाव आता शेतकऱ्यांना बांधून मिळणार असून भाव न देणाऱ्या दुध संघाला सबसीडी दिली जाऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. सात ते नऊ रुपयांचा शेतकºयांना आता फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांशी दुध दरवाढीबाबत चर्चा होऊन भाव वाढीचा निर्णय झाल्यानंतर आंदोलनाला यश मिळाले. राज्यात एक कोटी ४० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र गरज पाहता राज्यात २२ लाख लिटर दुध अतिरिक्त असल्याने दुधाच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला होता, असे ते म्हणाले.दीडपट हमी भावात सरकारची चलाखीदीडपट हमी भावाबाबत केंद्र सरकारने हात चलाखी केली आहे. सोयाबीनला ३३०० रुपये हमी भाव दिला असला तरी उत्पादन खचार्तील अनेक बाबींना त्यांनी फाटा दिला आहे. त्यामुळे दीडपट हमी भावात तफावत येत आहे. स्वामीनाथ आयोगाच्या सी-२ फॉर्म्युल्यानुसार दीडपट हमीभाव देण्याची आमची मागणी आहे. त्याला फाटा देण्यात आला आहे. सोबतच दीडपट हमी भावासंदर्भात कायद्यात रुपांतर होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना