शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
3
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
4
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
5
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
6
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
7
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
8
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
9
सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
10
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
11
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
12
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
13
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
14
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
15
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
16
“शरद पवारांना भारतरत्न पुरस्कार द्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाच्या खासदाराचे समर्थन
17
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
18
“विधान परिषदेतील गुणवत्तापूर्ण चर्चांचे दस्तऐवजीकरण म्हणजे लोकशाहीची खरी ताकद”: CM फडणवीस
19
Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड
20
मेस्सीला पाहण्यासाठी इतकं महागडं तिकीट, राज्यपाल संतापले; राज्य सरकारकडून मागवला रिपोर्ट
Daily Top 2Weekly Top 5

ई-फेरफारमध्ये अमरावती विभाग राज्यात दुसरा; अचलपूर तहसील प्रथम

By सदानंद सिरसाट | Updated: June 17, 2024 19:04 IST

राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे.

खामगाव (बुलढाणा) : जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी सात-बारा तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी फेरफार रुजू केला जातो. शासनाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शीपणे करण्यासाठी ई-फेरफार प्रणाली सुरू केली. त्यासाठी कायद्यानुसार कालावधी ठरलेल्या कालावधीतच किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात फेरफार रुजू करण्याच्या प्रक्रियेतील सरासरी दिवसांची संख्या पाहता अमरावती विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या विभागात अचलपूर तहसील प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात सरासरी २० दिवसांचा कालावधी घेत नाशिक विभाग प्रथम क्रमांकावर आहे.

सातबारा फेरफार हा सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाचा दस्त. पूर्वी हा सातबारा हस्तलिखित होता. केंद्र सरकारने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला. जमीन व्यवस्थापन पद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज ओळखून सर्व सात-बारा जमीन नोंदीचे संगणकीकरण केले. त्यामध्ये खरेदी दस्त नोंदणी करणारे दुय्यम निबंध कार्यालय जोडण्यात आले. या प्रक्रियेत दुय्यम निबंधकाकडे झालेले खरेदी व्यवहार थेट संबंधित जमिनीचा फेरफार रुजू करण्यासाठी तहसीलच्या यंत्रणेकडे आॅनलाइन दिसू लागले. त्या व्यवहारांच्या फेरफाराच्या माध्यमातून नवीन सातबारा नोंदी सुरू झाल्या.

- ठराविक कालावधीकडे लक्ष

व्यवहाराची दस्त नोंद झाल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालय ते तहसील कार्यालयात पुढील प्रक्रियेचे काम किती दिवसात होते, याचे पर्यवेक्षण महसूल विभागाकडून केले जात आहे. महाभूमी प्रकल्पांतर्गत ई फेरफार प्रणालीवर एखाद्या नागरिकांनी दस्त नोंद दिल्यानंतर किती दिवसांत सातबारा मिळाला, यावरून सरासरी दिवस निश्चित केले आहेत.

- अमरावती विभागातच वेळेतच सात-बारा

ठरवून दिलेल्या कालावधीत म्हणजे, २१ दिवसांतच अमरावती विभागात सात-बारा तयार होत आहे. तर अमरावती विभागात अचलपूर तालुका प्रथम स्थानावर आहे. या तहसीलमध्ये सरासरी १८ दिवसांतच फेरफाराची नोंद होऊन सात-बारा तयार केला जात आहे.

सर्वच पातळीवर प्रशासन हे गतिमान असावे, ही सर्वसामान्यांच्या अपेक्षेसह शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे - डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर 

सर्वसामान्यांची कामे वेळेतच व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सातत्याने आढावा घेण्यात येतो. सेवा वेळेत मिळत आहेत, याचा आनंद आहे - शामकांत मस्के, सहायक आयुक्त, भूसुधार, अमरावती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAmravatiअमरावतीFarmerशेतकरी