शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

डिसेंबरमध्ये 9537 मालमत्तांचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST

एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून ...

एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये ही सूट देण्यात आली होती. तेव्हापासून ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली. २०१९ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत २६ कोटी ४२ लाख ६१ हजार ३५० रुपयांची उलाढाल झाली होती. पूर्वी मुद्रांक शुल्काचा दर अधिक होता. त्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होती. मात्र आता मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आल्याने दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले असून मालमत्ता खरेदी, गहाण खत, बक्षीसपत्र, हस्तांतरण, हक्क सोडपत्र व्यवहारांचा यात समावेश आहे. बक्षीसपत्रांचे प्रमाणही त्यामुळे वाढले असून रक्ताच्या नात्यातील रखडलेल्या व्यवहारांनीही यात वेग घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ४,५९५ व्यवहार झाले तर ऑक्टोबरमध्ये ४,४७८, नोव्हेंबरमध्ये ४,९०१ आणि डिसेंबरमध्ये ९,५३७ व्यवहार झाले. चारही महिन्यांचा विचार करता २३ हजार ५११ मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आहेत.

दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन चलान भरल्यास ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. त्याअनुषंगाने रखडलेले व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी केलेली होती. शेवटच्या दिवशीही हे चित्र होते.

चार महिन्यांत ३२ कोटींची झाली उलाढाल

जिल्ह्यात चार महिन्यांत ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून उलाढाल झाली. ती महिन्यात सर्वाधिक १२ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपये एवढी होती.

नोंदणी फीपोटी ९ कोटी ९४ लाख २८ हजार ७६५ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे. गेल्या वर्षी शेवटच्या चार महिन्यांत पाच कोटी ५७ लाख ५७ हजार ३८५ रुपये नोंदणी फीपोटी मिळाले होते.

चार महिन्यांत ९० टक्क्यांनी व्यवहार वाढले आहेत. मुद्रांकापोटी डिसेंबर २०२० मध्ये ८ कोटी ८५ लाख ४५ हजार २३५ रुपयांचा महसूल मिळाला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्कापोटी सात टक्के अधिकचा महसूल शासनास मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट

कामे गतिमान करण्यास प्राधान्य देण्यात येत असून आता इंटरनेट सुविधेचाही वेग वाढविण्यासाठी खासगी जोडणीचा आधार घेऊन कामाचा वेग वाढविण्यास प्राधान्य राहणार आहे. शासनाने दिलेल्या या सवलतीमुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

- नितीन शिंदे,

जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी

कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना

कोरोना संसर्गाचा काळ पाहता अनुषंगिक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळण्यावर भर दिला गेला होता. डिसेंबर महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात वाढलेली गर्दी पाहता अनुषंगिक सूचना दिल्या गेल्या होत्या.