शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुरामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:39 IST

र्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो.

बुलडाणा : जिल्ह्यातील ८६ गावांना पावसाळ््यात पुराच्या पाण्याचा धोका असून त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली असून अनुषंगीक बचावाचे साहित्याचीही तयारी पूर्ण केली आहे.नुकत्याच क्षमलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात प्रसंग उद्भवल्यास नेमकी काय उपाययोजना केली आहे, याचा आढावा घेतला असता ही माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या तीन मोठ्या नद्या असून धामना, आमना, नळगंगा, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वान लहान नद्या आहेत.प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर जलसंपदा विभागामध्ये त्यादृष्टीने समन्वय राखण्याची गरज आहे. पुर्णा नदीला अगदी अमरावतीमध्येही पाऊस पडला तरी पुर येतो. त्यामुळे पुर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना पावसाळत नेहमीच वेढा पडण्याची भिती असते. २००६ मध्ये अतिवृष्टीदरम्यान पुर्णानदीच्या रौद्ररुपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुर्णा नदीच्या उपनद्यांमधील पाणीही पुर्णा नदीत न सामावल्या गेल्यामुळे त्याचा फटका अन्य गावांनाही बसला होता. या पार्श्वभूमीवर जुना अनुभव पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळतील संभाव्य आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. पट्टीचे पोहणारे, आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्क असलेले सर्च लाईट व साहित्य उपलब्ध करून आढावाही घेतला आहे. (प्रतिनिधी)या गावांना असतो पावसाळ््यात पुराचा धोकापुर्णा नदी व तिच्या उपनद्यांमुळे नदीकाठच्या नांदुरा तालुक्यातील २२, जळगाव जामोद मधील आठ, संग्रामपूरमधील पाच गावांना धोका असतो. यात प्रामुख्याने खेडगाव, पिंप्री कोळी, ईसरखेड, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, येरळी, बेलाड, खरकंडी, दादगाव, रोटी, हिंगणे दादगाव, भोटा, पळसोडा, पातोंडा, सावरगाव, वडगाव दिघी, वडी, मामुलवाडी, आस्वंद, भोन, पेसोडा, इटखेड, सावली, आडगाव बु. माहुली, पळशी वैद्य, पळशी भाट, हिंगणे बाळापूर, दादुलगाव जुने, माणेगाव, गोळेगाव बु. माहुली या गावांचा पुराचा धोका असतो. शेगावात दहा, मेहकरमध्ये १२ गावांनाही पुराचा धोका आहे.पुरामुळे पाच वर्षात १२ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांचीही माहितीही संकलीत केली आहे. गेल्या पाच वर्षात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये दोन, २०१८ मध्ये एक आणि २०१९ मध्ये सहा व्यक्तींचा अशा एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांवरील यंत्रणाही जलसंपदा विभागाने पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर तपासली असून प्रकल्पनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्पावरील संदेश वहनाच्या राहित्याचीही तपासणी करून घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfloodपूरriverनदी