शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुरामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:39 IST

र्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो.

बुलडाणा : जिल्ह्यातील ८६ गावांना पावसाळ््यात पुराच्या पाण्याचा धोका असून त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली असून अनुषंगीक बचावाचे साहित्याचीही तयारी पूर्ण केली आहे.नुकत्याच क्षमलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात प्रसंग उद्भवल्यास नेमकी काय उपाययोजना केली आहे, याचा आढावा घेतला असता ही माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या तीन मोठ्या नद्या असून धामना, आमना, नळगंगा, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वान लहान नद्या आहेत.प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर जलसंपदा विभागामध्ये त्यादृष्टीने समन्वय राखण्याची गरज आहे. पुर्णा नदीला अगदी अमरावतीमध्येही पाऊस पडला तरी पुर येतो. त्यामुळे पुर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना पावसाळत नेहमीच वेढा पडण्याची भिती असते. २००६ मध्ये अतिवृष्टीदरम्यान पुर्णानदीच्या रौद्ररुपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुर्णा नदीच्या उपनद्यांमधील पाणीही पुर्णा नदीत न सामावल्या गेल्यामुळे त्याचा फटका अन्य गावांनाही बसला होता. या पार्श्वभूमीवर जुना अनुभव पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळतील संभाव्य आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. पट्टीचे पोहणारे, आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्क असलेले सर्च लाईट व साहित्य उपलब्ध करून आढावाही घेतला आहे. (प्रतिनिधी)या गावांना असतो पावसाळ््यात पुराचा धोकापुर्णा नदी व तिच्या उपनद्यांमुळे नदीकाठच्या नांदुरा तालुक्यातील २२, जळगाव जामोद मधील आठ, संग्रामपूरमधील पाच गावांना धोका असतो. यात प्रामुख्याने खेडगाव, पिंप्री कोळी, ईसरखेड, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, येरळी, बेलाड, खरकंडी, दादगाव, रोटी, हिंगणे दादगाव, भोटा, पळसोडा, पातोंडा, सावरगाव, वडगाव दिघी, वडी, मामुलवाडी, आस्वंद, भोन, पेसोडा, इटखेड, सावली, आडगाव बु. माहुली, पळशी वैद्य, पळशी भाट, हिंगणे बाळापूर, दादुलगाव जुने, माणेगाव, गोळेगाव बु. माहुली या गावांचा पुराचा धोका असतो. शेगावात दहा, मेहकरमध्ये १२ गावांनाही पुराचा धोका आहे.पुरामुळे पाच वर्षात १२ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांचीही माहितीही संकलीत केली आहे. गेल्या पाच वर्षात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये दोन, २०१८ मध्ये एक आणि २०१९ मध्ये सहा व्यक्तींचा अशा एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांवरील यंत्रणाही जलसंपदा विभागाने पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर तपासली असून प्रकल्पनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्पावरील संदेश वहनाच्या राहित्याचीही तपासणी करून घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfloodपूरriverनदी