शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुरामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:39 IST

र्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो.

बुलडाणा : जिल्ह्यातील ८६ गावांना पावसाळ््यात पुराच्या पाण्याचा धोका असून त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली असून अनुषंगीक बचावाचे साहित्याचीही तयारी पूर्ण केली आहे.नुकत्याच क्षमलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात प्रसंग उद्भवल्यास नेमकी काय उपाययोजना केली आहे, याचा आढावा घेतला असता ही माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या तीन मोठ्या नद्या असून धामना, आमना, नळगंगा, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वान लहान नद्या आहेत.प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर जलसंपदा विभागामध्ये त्यादृष्टीने समन्वय राखण्याची गरज आहे. पुर्णा नदीला अगदी अमरावतीमध्येही पाऊस पडला तरी पुर येतो. त्यामुळे पुर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना पावसाळत नेहमीच वेढा पडण्याची भिती असते. २००६ मध्ये अतिवृष्टीदरम्यान पुर्णानदीच्या रौद्ररुपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुर्णा नदीच्या उपनद्यांमधील पाणीही पुर्णा नदीत न सामावल्या गेल्यामुळे त्याचा फटका अन्य गावांनाही बसला होता. या पार्श्वभूमीवर जुना अनुभव पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळतील संभाव्य आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. पट्टीचे पोहणारे, आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्क असलेले सर्च लाईट व साहित्य उपलब्ध करून आढावाही घेतला आहे. (प्रतिनिधी)या गावांना असतो पावसाळ््यात पुराचा धोकापुर्णा नदी व तिच्या उपनद्यांमुळे नदीकाठच्या नांदुरा तालुक्यातील २२, जळगाव जामोद मधील आठ, संग्रामपूरमधील पाच गावांना धोका असतो. यात प्रामुख्याने खेडगाव, पिंप्री कोळी, ईसरखेड, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, येरळी, बेलाड, खरकंडी, दादगाव, रोटी, हिंगणे दादगाव, भोटा, पळसोडा, पातोंडा, सावरगाव, वडगाव दिघी, वडी, मामुलवाडी, आस्वंद, भोन, पेसोडा, इटखेड, सावली, आडगाव बु. माहुली, पळशी वैद्य, पळशी भाट, हिंगणे बाळापूर, दादुलगाव जुने, माणेगाव, गोळेगाव बु. माहुली या गावांचा पुराचा धोका असतो. शेगावात दहा, मेहकरमध्ये १२ गावांनाही पुराचा धोका आहे.पुरामुळे पाच वर्षात १२ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांचीही माहितीही संकलीत केली आहे. गेल्या पाच वर्षात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये दोन, २०१८ मध्ये एक आणि २०१९ मध्ये सहा व्यक्तींचा अशा एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांवरील यंत्रणाही जलसंपदा विभागाने पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर तपासली असून प्रकल्पनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्पावरील संदेश वहनाच्या राहित्याचीही तपासणी करून घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfloodपूरriverनदी