शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ गावांना पुरामुळे धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:39 IST

र्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो.

बुलडाणा : जिल्ह्यातील ८६ गावांना पावसाळ््यात पुराच्या पाण्याचा धोका असून त्यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता बाळगली असून अनुषंगीक बचावाचे साहित्याचीही तयारी पूर्ण केली आहे.नुकत्याच क्षमलेल्या निसर्ग चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात प्रसंग उद्भवल्यास नेमकी काय उपाययोजना केली आहे, याचा आढावा घेतला असता ही माहिती समोर आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने पैनगंगा, खडकपूर्णा आणि पूर्णा या तीन मोठ्या नद्या असून धामना, आमना, नळगंगा, विश्वगंगा, व्याघ्रा, ज्ञानगंगा, मस, मन, तोरणा, बोर्डी आणि वान लहान नद्या आहेत.प्रामुख्याने जिल्ह्यातून वाहनाऱ्या पूर्णा नदीमुळे दरवर्षी नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर, मलकापूर तालुक्यातील काही गावांना फटका बसत असतो. त्यामुळे आंतरजिल्हास्तरावर जलसंपदा विभागामध्ये त्यादृष्टीने समन्वय राखण्याची गरज आहे. पुर्णा नदीला अगदी अमरावतीमध्येही पाऊस पडला तरी पुर येतो. त्यामुळे पुर्णा नदीकाठच्या जिल्ह्यातील गावांना पावसाळत नेहमीच वेढा पडण्याची भिती असते. २००६ मध्ये अतिवृष्टीदरम्यान पुर्णानदीच्या रौद्ररुपामुळे मोठे नुकसान झाले होते. त्यातच पुर्णा नदीच्या उपनद्यांमधील पाणीही पुर्णा नदीत न सामावल्या गेल्यामुळे त्याचा फटका अन्य गावांनाही बसला होता. या पार्श्वभूमीवर जुना अनुभव पाहता आपत्ती व्यवस्थापन विभागाने पावसाळतील संभाव्य आपत्कालीन स्थितीच्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. पट्टीचे पोहणारे, आपत्कालीन स्थितीमध्ये आवश्क असलेले सर्च लाईट व साहित्य उपलब्ध करून आढावाही घेतला आहे. (प्रतिनिधी)या गावांना असतो पावसाळ््यात पुराचा धोकापुर्णा नदी व तिच्या उपनद्यांमुळे नदीकाठच्या नांदुरा तालुक्यातील २२, जळगाव जामोद मधील आठ, संग्रामपूरमधील पाच गावांना धोका असतो. यात प्रामुख्याने खेडगाव, पिंप्री कोळी, ईसरखेड, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, येरळी, बेलाड, खरकंडी, दादगाव, रोटी, हिंगणे दादगाव, भोटा, पळसोडा, पातोंडा, सावरगाव, वडगाव दिघी, वडी, मामुलवाडी, आस्वंद, भोन, पेसोडा, इटखेड, सावली, आडगाव बु. माहुली, पळशी वैद्य, पळशी भाट, हिंगणे बाळापूर, दादुलगाव जुने, माणेगाव, गोळेगाव बु. माहुली या गावांचा पुराचा धोका असतो. शेगावात दहा, मेहकरमध्ये १२ गावांनाही पुराचा धोका आहे.पुरामुळे पाच वर्षात १२ जणांचा मृत्यूबुलडाणा जिल्ह्यात पुरामुळे मृत्यू पावलेल्यांचीही माहितीही संकलीत केली आहे. गेल्या पाच वर्षात १२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २०१५ मध्ये तीन, २०१६ मध्ये दोन, २०१८ मध्ये एक आणि २०१९ मध्ये सहा व्यक्तींचा अशा एकूण १२ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.जिल्ह्यातील ९१ प्रकल्पांवरील यंत्रणाही जलसंपदा विभागाने पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर तपासली असून प्रकल्पनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रकल्पावरील संदेश वहनाच्या राहित्याचीही तपासणी करून घेण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfloodपूरriverनदी