शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:38 IST

दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यासाठी ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. मुदतीनंतरही या तक्रारींचा पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशी हे दोन प्रमुख पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात. परंतू यंदा सोयाबीन उगवले नसल्याचे प्रमाण वाढले आहे. मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पेरणी केली. परंतू शेतकºयांसमोर यंदा बोगस बियाण्याचे नवे संकट निर्माण झाले. अनेकांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही. महाबिजसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकºयांनी पेरले; परंतू बियाणे न उगवल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात १६ जून पर्यंत झालेल्या पावसामुळे २० जुनपर्यंत मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. दरम्यान, सोयाबीन बियाणे पुढील आठ दिवसात उगवणे अपेक्षीत होते. परंतू अनेकांचे सोयाबीन उगवले नाही. सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देण्याच्या सुचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५ जुलैची मुदत दिली होती. आता मुदतीनंतरही सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. सध्या २ हजार ७५२ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या खामगाव तालुक्यातून आहेत. एकट्या खामगाव तालुक्याूतन ७२८ तक्रारी आल्या आहेत. एकूण २ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावरी बियाणे उगवले नाही. तक्रारीनंतर त्याचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडे मदतीसाठी प्रस्ताव देण्यात येत आहेत. परंतू आतापर्यंत ८३ टक्के शेतकºयांना मदत मिळालेली नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती