शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

साखरखेर्डा परिसरात आतापर्यंत ८१० पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST

साखरखेर्डा : प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८१० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना खासगीपेक्षा प्राथमिक ...

साखरखेर्डा : प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ८१० जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना खासगीपेक्षा प्राथमिक आराेग्य केंद्राचाच माेठा आधार मिळाल्याचे चित्र साखरखेर्डा परिसरात आहे.

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि पाच उपकेंद्रात आरटीपीसीआरच्या २ हजार ९९४ आणि रॅपिडच्या ३ हजार ५७९ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८१० जण कोरोना पाॅझिटिव्ह निघाले. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर ज्याच्या जवळ पैसा आहे, अशा रुग्णांनी प्रथम स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. केस क्रिटिकल होताच स्थानिक डाॅक्टरांनी चिखली, बुलडाणा, मेहकर, जालना आणि औरंगाबाद शहरात रुग्णांना हलविण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. खरेतर कोरोनावर निदान कसे करायचे, याचे ज्ञान नसताना केवळ पैशांच्या लोभापायी रुग्णांना झुलवत ठेवून त्यांना काय साध्य करायचे होते, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे. या उपचारादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे साखरखेर्डा आणि परिसरातील गावे कोरोना हाॅटस्पाॅट ठरली होती. या कोरोना काळात कोरोना चाचणी घेणारे डॉ. गजानन चव्हाण पाॅझिटिव्ह रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्या, घरीच क्वारंटाईन रहा, असा सल्ला डॉ. संदीप सुरुशे आणि डॉ. प्रियंका अग्रवाल देत हाेते. हाेम क्वारंटाईन केलेल्या सर्व रुग्णांची तपासणी येथील आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका करत असत. रुग्णांची सेवा करता करता प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यांनी धीर सोडला नाही. जी औषधे रुग्णांना दिली, तीच औषधे त्यांनी घेतली आणि स्वतः कोरोनामुक्त झाले. रुग्णांनाही कोरोनामुक्त केले. ८१०पैकी किमान ३००हून अधिक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधांवर बरे झाले. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीडी ही ३५० ते ४०० पर्यंत आहे. प्रत्येक गावात जाऊन डॉ. प्रवीण ठोसरे, डॉ. रिंढे, डॉ. वायाळ यांच्यासह आरोग्यसेवक बी. टी. गिऱ्हे, जी. ए. भोंडे यांनी कॅम्प घेऊन कोरोना चाचणी घेतली. त्यामुळेच ग्रामीण भागातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळते.

लसीकरणाचीही गती वाढली

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २ हजार ८३८ व्यक्तिंना कोविशिल्डचा पहिला डोस, तर १०८० व्यक्तिंना दुसरा डोस देण्यात आला. १९२ व्यक्तिंना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला.

कोरोनाला हरवायचे असेल तर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. होमक्वारंटाईन राहून नियमित औषध घेणे गरजेचे आहे. ते नियम पाळल्यानेच रिकव्हरी झाली.

डॉ. संदीप सुरुशे

वैद्यकीय अधिकारी

माझा सीआरपी प्रथम ४२ होता. माझे वय ८० वर्षांचे आहे. नियमित तपासणी आणि हिंमत खचू न देता प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिलेले औषध घेतल्याने सीआरपी फक्त दोन आहे. माझी तब्येत ठणठणीत आहे.

भीमराव इंगळे,

अध्यक्ष, शिवाजी व्यायाम शाळा, साखरखेर्डा