शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

By निलेश जोशी | Updated: November 20, 2022 13:19 IST

पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले.

बुलढाणा : भारत जाेडाे पदयात्रेच्या ७३ व्या दिवशी नारी शक्तीचा प्रभाव दिसून आला. निमित्त हाेते माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे. या पदयात्रेचा महाराष्ट्रातील हा १३ वा दिवस आहे. जवळपास ८०० महिला भास्तनपर्यंत सहभागी झाल्या होत्या.

पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले. शेगावपासून सहा किमी अंतरावर खेर्डी येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सकाळी शेगाव येथे इंदिरा गांधी यांना अभिवादन करून ही यात्रा पुढे रवाना झाली. 

रेल्वे गेटसमोर अडकला यात्रेतील कंटेनरचा ताफाशेगाव - भारत जोडो यात्रा जलंब गावातून बाहेर जात असताना यात्रेतील कंटेनर जलंब येथील मध्य रेल्वेच्या गेटसमोरील  बॅरिकेड्समध्ये अडकला. प्रशासनाने धावाधाव करत जेसीबी बोलावून रस्ता खाेदून माेकळा केला. यासाठी अर्धा तास लागल्याने यात्रेतील वाहनांचा खोळंबा झाला होता. यात्रेसाेबत विविध साहित्यांचे कंटेनर आहेत. यात्रेसाेबत सकाळी कंटेनरचा ताफाही निघाला. जलंब रेल्वे गेटजवळ उच्च विद्युतवाहिनीच्या तारा असल्याने येथे बॅरिकेड्स लावले आहेत. चालकांच्या हे लक्षात आल्याने ताफा, इतर वाहने थांबवावी लागली.  

पदयात्रींचा दिवस सुरू होतो पहाटे चार वाजता! -शेगाव - ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील यात्रींचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. पहाटे पाचपासूनच यात्री यात्रेत सहभागी होतात. सकाळी यात्रा सुरू होण्यापूर्वीच यात्री नियोजनात व्यस्त हाेतात. त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे नियोजन तसेच व्यवस्थेबाबत सूचना त्यांना रात्रीच गटप्रमुखांकडून दिल्या जातात. सूचनेनुसारच दुसऱ्या दिवशीचे नियोजन ठरते. शनिवारी पहाटे ५ वाजता नियोजित स्थळापर्यंत यात्रेत सहभागी हाेणारी जनता शिस्तीने पोहोचली हाेती.

कुंचल्यातून रेखाटले इंदिरा गांधींचे चित्र -शेगाव - भारत जोडो यात्रा मार्गावरील माटरगाव जवळील रस्त्यालगत इंदिरा गांधी व राष्ट्रीय एकात्मता दाखवणारे चित्र बुलढाण्याचे चित्रकार सेवानिवृत्त कला शिक्षक सुभाष देशमुख यांनी रेखाटले आहे. हे चित्र ते राहुल गांधी यांना देणार हाेते, परंतु ते देणे त्यांना शक्य झाले नाही.  

एक दिवस विश्राम -भारत जाेडाे यात्रा २० नाेव्हेंबर राेजी निमखेडी येथे पाेहोचणार आहे, तसेच २१ नाेव्हेंबर रोजी पदयात्रेला विश्राम असून, २२ नाेव्हेंबरला सकाळी ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जयराम रमेश यांनी दिली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसbuldhanaबुलडाणा