शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:51 IST

शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमीत शाळा सुरू करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ६२४ शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत. परंतू प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांची पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आलेल्या अहवालाची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या ६२४ शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत नकार दर्शविला आहे. शाळा स्तरावर पालकांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली असता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. अद्याप इतर काही शाळांचे अहवाल येणे बाकी असले तरी, जास्त शाळांकडून नकारात्मक सूर येत असल्याने शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्स्तुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत लेखी स्वरूपात कुठलेच आदेश मिळालेले नाही. मात्र आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.वाहतूकीचा प्रश्नकाही शिक्षण संस्थाकडे स्वत: च्या स्कूल बस नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतूकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलया जाऊ शकत नाही.काय आहे पालकांची भूमिका...प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. विद्यर्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.

नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्था व पालकांचे मत जाणून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६२४ शाळांनी वर्ग सुरू करण्याला नकार दिला. शासनाकडून येणाऱ्या सुचनानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

 

 

 

टॅग्स :SchoolशाळाbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र