शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:51 IST

शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमीत शाळा सुरू करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ६२४ शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत. परंतू प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांची पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आलेल्या अहवालाची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या ६२४ शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत नकार दर्शविला आहे. शाळा स्तरावर पालकांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली असता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. अद्याप इतर काही शाळांचे अहवाल येणे बाकी असले तरी, जास्त शाळांकडून नकारात्मक सूर येत असल्याने शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्स्तुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत लेखी स्वरूपात कुठलेच आदेश मिळालेले नाही. मात्र आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.वाहतूकीचा प्रश्नकाही शिक्षण संस्थाकडे स्वत: च्या स्कूल बस नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतूकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलया जाऊ शकत नाही.काय आहे पालकांची भूमिका...प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. विद्यर्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.

नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्था व पालकांचे मत जाणून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६२४ शाळांनी वर्ग सुरू करण्याला नकार दिला. शासनाकडून येणाऱ्या सुचनानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

 

 

 

टॅग्स :SchoolशाळाbuldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र