शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

प्रोत्साहनपर रकमेपासून ६२ हजार शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:25 IST

नियमित कर्ज भरणारे ६२ हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.

- विवेक चांदुरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नियमित कजार्ची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा महाआघाडी सरकारने केली होती. मात्र अद्याप त्याची अधिसूचनाही काढण्यात आली नाही. जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणारे ६२ हजार शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.जिल्ह्यात ३ लाख ६० हजार शेतकरी दरवर्षी पीककजार्चा लाभ घेतात.राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत यापैकी १ लाख ९० हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी १ लाख ५० हजार पेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात ८७ टक्के शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ५२ हजार शेतकºयांचे कर्ज २०१५ पूवीर्पासून थकीत आहे. त्यामुळे या शेतकºयांना महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. जिल्ह्यात ६२ हजार शेतकरी नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत. शासनाच्यावतीने राज्यातील शेतकºयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करताना, नियमित कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप कोणत्याच शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली नाही. त्यामुळे आघाडी शासनाला घोषणेचा विसर पडला की, काय असा प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करीत आहेत.नव्या हंगामाला चार महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकºयांना अनदान मिळाले नाही. त्यामळे महाआघाडीची घोषणा फसवी ठरत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये आहे. जिल्ह्यातील नियमित कजार्ची परतफेड करणारे ६२ हजार शेतकरी प्रोत्साहनपर मदतीपासून वंचित आहेत.जिल्ह्यात यावर्षी कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतमाल विक्री करण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने शेतकºयांना गावातील व्यापाºयांना कमी भावात शेतमालाची विक्री करावी लागली. त्यातच यावर्षी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने मुग व उडीदाच्या पिकांचे ९० टक्के नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतातच झाडाला असलेल्या मुग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले तर काही भागात पीक काळे पडले आहे. हजारो हेक्टरवरील कपाशी पिकांची बोंड व पाने अतिपावसामुळे जमिनीवर पडली आहेत. तसेच शेतात पाणी साचल्यानेही शेकडो हेक्टरवरील पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकरी ओल्या दुष्काळाच्या सावटात आहेत. त्यातच सध्या परिस्थितीत किटकनाशक, रासायानिक खत व मजुरांचे वाढलेले दर लक्षात घेतल्यास अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.तसेच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने शेतकºयांना फवारणीसाठी पैशांची गरज आहे. मात्र शासनाकडून प्रोत्साहन निधी मिळाला नसल्याने शेतकºयांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरीत निधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.नियमित कजार्ची परतफेड करणाºया शेतकºयांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले नाही.- उत्तम मनवर, व्यवस्थापक,जिल्हा अग्रणी बँक, बुलडाणा.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी